आरटीओ शिवानंद मगदूम यांचे मत
प्रतिनिधी/ बेळगाव
भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधाचे शिल्पकार म्हणतात. 26 नोव्हेंबर 1949 साली राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारताचे संविधान अंमलात आणण्यात आले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अविस्मरणीय आहे. भारताच्या संविधानाचा आदर ठेवा आणि त्यानुसारच कामे करा, असे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम यांनी केले.
आरटीओ कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरटीओ शिवानंद मगदूम बोलत होते. त्यांनी भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यात आले आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजयीक न्याय या विचाराने भारत चालतो. त्यामुळे संविधानातील अनेक कायदे अभ्यासण्याची गरज आहे. आज वाहन परवाना अथवा कोणतेही काम आरटीओ कार्यालयात व्हायचे असल्यास ते संविधानावर आधारीतच केले जाते. त्यामुळे संविधानाचा अभ्यास हा प्रत्येकाला असणे गरजेचे असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कायदा सल्लागार रुपा पाटील, ऍड. लता हंचीनमनी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. स्वागत आरटीओ कार्यालयातील अधिकारी पद्मावती मरनेन्नावर यांनी केले. यावेळी सुत्रसंचालन मोटार वाहनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश आडीन यांनी केले. आभार सुजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी कचेरी अधिकारी शरण्णप्पा हुग्गी व मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.