अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान : ‘सरेंडर मोदी’वरून काँग्रेसला फटकारले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काश्मीरमधील गलवान खोऱयातील चकमकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ‘सरेंडर मोदी’ असे संबोधले होते. या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘संसदेत या’ असे आमंत्रण देत 1962 पासूनच्या सर्वच भारत-चीन कारवायांवर चर्चा घडवून आणण्याचा पवित्रा जाहीर केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसचा कडक शब्दात समाचार घेतला. यावेळी त्यांनी अन्य बऱयाच मुद्दय़ावरही परखडपणे सरकारची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेससारख्या मोठय़ा पक्षाचे माजी अध्यक्ष अत्यंत घाणेरडय़ा प्रकारचे राजकारण करत आहेत याची मला कीव येते. तुम्हाला जर चर्चाच करायची असेल, तर संसदेत या, मग आपण 1962 पासून आजवर काय घडले यावर चर्चा करु असे खुले आव्हान अमित शहा यांनी राहुल गांधींना दिले आहे. काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये चीन आणि पाकिस्तान या भारतविरोधी देशांना पोषक ठरत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. गलवान खोऱयात झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना उद्देशून ‘सरेंडर मोदी’ असे ट्विट केले होते. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला.
कोरोनाविरोधी लढा योग्य मार्गावर
भारत अत्यंत स्थैर्याने आणि धैर्याने कोरोना विरोधातील लढा पुढे नेत आहे. आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात कोरोनाची लढाई अत्यंत धैर्याने सुरू ठेवली आहे. आपण जगाच्या तुलनेत कोरोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढत आहोत. जगाच्या तुलनेत आपल्याकडील परिस्थिती बरीच नियंत्रणात आहे. हे सर्वकाही मोदींच्या नेतृत्त्वामुळे शक्मय झाल्याचे ते म्हणाले.