आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी वर्ष पूर्ण होणार – बैठकीनंतर निर्णयांची घोषणा
वृत्तसंस्था / सोनिपत
कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी एक महत्त्वाची बैठक घेत अनेक निर्णय घेतले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमधून दिल्लीच्या सर्व सीमांवर मोठी गर्दी जमविण्याचा आणि तेथे मोठय़ा सभा घेण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे.
29 नोव्हेंबरपासून दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अशा सिथतीत 29 नोव्हेंबरपासून संसद अधिवेशनाच्या अखेरपर्यंत 500 निवड शेतकरी ट्रक्टर ट्रॉलींमधून दरदिनी संसद भवन येथे जातील असे मोर्चाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
28 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात एक विशाल शेतकरी-मजूर महापंचायतचे आयोजन करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. हे आयोजन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या बॅनरखाली महाराष्ट्रातील 100 हून अधिक संघटनांच्या वतीने संयुक्तपणे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
26 नोव्हेंबर रोजी कृषी कायद्यांच्या विरोधातील निदर्शनांना वर्ष पूर्ण होणार आहे. मागील वर्षी 26 नोव्हेंबर रोजी निदर्शकांनी हरियाणात प्रवेश केला होता आणि दुसऱया दिवशी कुंडली सीमेवर जीटी मार्गावरील वाहतूक रोखून धरत आंदोलन सुरू केले होते. तर गाजीपूर सीमेवरही राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.