वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदी हे लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही मिळून तयार करण्यात आलेल्या नव्या संसद टीव्हीचा 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ करणार आहेत. संसदेच्या अधिवेशनाचे संसद टीव्हीच्या दोन्ही वाहिन्यांवर थेट प्रसारण केले जाणार आहे. या नव्या वाहिनीवर काँग्रेस नेते कर्ण सिंह, अर्थतज्ञ विवेक देब्रोय, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि वकील हेमंत बत्रा हे विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समजते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना लोकशाहीवादी मूल्ये आणि देशाच्या संस्थांशी संबंधित विषयांवर उच्च गुणवत्तायुक्त माहितीपूरक कार्यक्रम संसद टीव्हीच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत. या वाहिनीला पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत औपचारिक स्वरुपात लाँच करण्यात येणार आहे.
कर्ण सिंह हे विविध धर्मांविषयी तर विवेक देब्रोय इतिहास आणि अमिताभ कांत हे बदलता भारत या विषयावरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणार आहेत. हेमंत बत्रा कायदेशीर विषयांवरील कार्यक्रमांचे संचालन करतील. अर्थ मंत्रालयातील प्रमुख सल्लागार संजीव सान्याल अर्थव्यवस्थेवर आणि एंडोक्राइनॉलॉजीवर प्रख्यात डॉक्टर अंबरीश मिथायी हे कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणार आहेत.
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि वस्त्राsद्योग मंत्रालयातील माजी सचिव रवि कपूर हे संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर लोकसभा सचिवालयातील संयुक्त सचिव मनोज अरोरा याचे विशेष कार्याधिकारी आहेत.