मोरजी/प्रतिनिधी
भावी पिढय़ांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी संस्कृती रक्षक भारतीय भाषांशी गद्दारी करणाऱया लोकप्रतिनिधीना गोव्याच्या राजकीय क्षितिजावरून हद्दपार करूया असे प्रतिपादन भाषा सुरक्षा मंचाचे गोवा राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.
भारतीय भाषा रक्षणासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे सुरु केलेल्या धरणे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मांदे येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अर्ध पुतळय़ाजवळ आयोजित केलेल्या या धरणे कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे मांदे प्रभाग प्रमुख श्री तरणी गांवकर, श्री कृष्णा नाईक,श्री शशिकांत हरमलकर,प्रा.गजानन मांदेकर आदी उपस्थित होते.
प्रा.वेलिंगकर यांनी आपल्या भाषणात भाषा सुरक्षा मंचाने भारतीय भाषांच्या सुरक्षे साठी हाती 2011 पासून हाती घेतलेल्या आंदोलनाचा थोडक्मयात आढावा घेताना भारतीय जनता पक्षाने भारतीय भाषांची कशी फसवणूक केली हे सागताना अश्या विश्वासघातकी प्रवृत्तींना ठेचण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षकांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.भारतीय भाषा सुरक्षेसाठी मोजकेच स्वाभिमानी संस्कृती प्रेमी एकत्र येत असले तरी एक सूर्य जसा जगाला तापमानीत करतो त्याप्रमाणे भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांची तेजस्विता लक्षात घेतल्यास आपण भल्याभल्यांना पद्च्च?त करू शकतो त्यांची जागा दाखवून देवू शकतो .गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर त्यांच्या कन्या माजी मुख्यमंत्री शशिकला ताई काकोडकर या खर्या अर्थाने भारतीय भाषांच्या रक्षक होत्या ,मात्र त्यानंतर सर्वानीच या भाषांची उपेक्षा केली.विध्यमान सरकार तर भारतीय भाषांच्या मुळावरच उठले आहे भारतीय भाषा आंदोलनाची री ओढत गोव्याच्या सत्तास्थानापर्यंत पोचल्याना पुन्हा खाली खेचण्याची वेळ आली आहे जो पर्यंत इंग्रजी प्राथमिक शाळांचे राष्ट्र विरोधी अनुदान बंद होवून भारतीय भाषांचे बंद झालेले अनुदान आणि नवीन शाळांना परवानगी दिली जात नाही तो पर्यंत हे आंदोलन थांबणार नाही प्रसंगी या आंदोलनात भारतीय भाषांच्या भक्षकाना जमिनीत गाडू असे ते म्हणाले.देवभूमी गोमंतकात आम्ही देव निर्माण करण्याच्या नादात भाजपच्या रूपाने दानव निर्माण केले याची खंत आम्हाला आहेच त्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी आम्ही अवश्य देवू मात्र चूक सुधारली गेली नाही तर त्यांनी आपले शंभर अपराध भरले असे समजावे आणि जनतेनेही या अपराध्या?ना कठोर शिक्षा देण्यास आम्हाला सहकार्य करावे असे सांगितले.मातृभाषाना पायदळी तुडवणार्यांना चांगलाच धडा शिकवूया गोव्याचा नागाल्यांड करण्याचा डाव हाणून पाडूया असे ते म्हणाले.
यावेळी भाषा सुरक्षा मंचाचे निमंत्रक प्रा.गजानन मांदेकर यांनी मंचच्या मागण्या मांडताना सांगितले कि,इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे शासकीय अनुदान बंद करणे,कोकणी व मराठी माध्यमांच्या खासगी प्राथमिक शाळांचे प्रतीविध्यार्थी मासिक 400 रु अनुदान थकबाकीसह तत्काल परत करणे,कोकणी व मराठी माध्यमाच्या नवीन खासगी प्राथमिक सगळय़ा परवानगी अर्जांना एक किमी अंतराची अट शिथिल करून परवानगी देणे ,नव्याने सुरु करण्यात आलेल्याखासगी 91 मराठी व कोंकणी प्राथमिक शाळांना पर्रीकर सरकारने जाहीर केलेले 17 लाख रुपयांचे विशेष अनुदान तत्काळ चुकते करणे, मराठी व कोंकणी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळा बंद पडू नयेत म्हणून प्राचार्य माधव कामत समितीच्या गेली अनेक वर्षे धूळखात पडलेल्या महत्वपूर्ण शिफारशी तत्काळ अमलात आणणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व प्राथमिक शाळांचे माध्यम मराठी किवा कोकणी करणे इत्यादी मागण्या असल्याचे सांगून अश्या धरणे आंदोलनातून हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे त्यासाठी भारतीय संस्कृतीचे रक्षण करणाऱया मठ,मंदिरे ,विविध साहित्यकि -सांस्कृतिक संस्था ,मराठी,कोकणी ,हिंदी भाषांचे शिक्षक तसेच स्वतःला भारतीयसंस्कृतीचे रक्षक म्हणवणार्यां सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे सांगितले
या प्रसंगी सीताराम नाईक,उत्कर्षा परब ,यांनी आपले विचार मांडले
या धरणे आंदोलनात प्रा.सुभाष वेलिंगकर .तरणी गावकर ,प्रा.गजानन मांदेकर ,कृष्णा नाईक ,राया नाईक ,शशिकांत हरिजन ,स्वरूप नाईक,सुदीप नाईक,शरद गावडे,सिद्धेश नाईक ,महेंद्र परब, उत्कषां परब,येसूबाई म्हाकले,मनीषा पेडणेकर ,प्रमिला नाईक,संजना कासकर ,सर्वेश कोरगावकर ,संजय कासकर,संजय नाईक,आत्माजी नाईक,संतोष चोडणकर ,जगन्नाथ मांदेकर ,पुनाजी परब,विश्वास सांगळे,मनोहर पेडणेकर ,राया नाईक,शामसुंदर म्हाकले,वरद फडते ,सुधा इब्रामपूरकर,मंदार शेटय़?,निखील शेटय़?,नंदादिपक शेटय़?,भूमन्यू च्यारी, निर्मल इंदू च्यारी ,संतोष शेटगावकर तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर इत्यादींनी भाग घेतला.
प्रारंभी भाषा सुरक्षा मंचाचे राज्य निमंत्रक प्रा.सुभाष वेलिंगकर व हरमलचे माजी सरपंच रामचंद्र उर्फ बाबी केरकर यांच्या हस्ते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तरणी गावकर यांनी स्वागत केले शरद गावडे यांनी सूत्रसंचालन केले प्रा.गजानन मांदेकर यांनी आभार मानले.