चावडी काणकोणची परिस्थिती पालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष
प्रतिनिधी / काणकोण
वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने 31 मे पर्यंत जनता कर्फ्यू लावलेला असून सकाळच्या सत्रात दुपारी 1 वाजे पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोकळीक दिलेली आहे. मात्र या मोकळीकेचा काणकोण तालुकयात गेरफायदा घेण्यात येत असून सकाळच्या सत्रात गजबजाट आणि संध्याकाळच्या सत्रात शुकशुकाट अशी अवस्था या ठिकाणी पहायला मिळत आहे.
चावडीवरील मासळी मार्केट पूर्ण पणे या कालावधीत बंद ठेवण्यात आलेले आहे. ज्या महिला पणसुले रस्त्यावर बसून मासे विक्री करतात त्या सामाजिक अंतराचे निर्बध सांभाळुन करीत असल्याचे दिसत आहे. लोकही या ठिकाणी गर्दी करीत नाहीत. मात्र पालिका भाजी मार्केटमध्ये व्यवहार करणाऱया बहुतेकांनी सद्या हम रस्त्यावर बाजार मांडलेला असून फळभाज्या आणि अन्य खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडालेली पहायला मिळत आहे. त्यातच चार रस्ता येथील रेल्वे पूल ते शेळेर पर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला प्लॅस्टिकचा बाजार मांडण्यात आलेला आहे. पावसाळयाच्या पुरूमेत साठी प्लॅस्टिक खरेदीसाठी या ठिकाणी देखील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. चावडीवरील बागायतदार बझार आणि अन्य आस्थापनामध्ये नेहमीचीच गर्दी दिसत असून यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाचे असताना त्यावर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत ना. गावकर यानी केला आहे. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आलेली असून कितीही सांगितले तरी लोक ऐकत नाहीत अशी कैफियत चावडी बाजारात तैनात केलेल्या काही पोलिस कर्मचाऱयांनी या प्रतिनिधीशी बोलताना मांडली. प्रत्येक नागरीकांना जीवनावश्यक वस्तु मिळायलाच हव्यात त्यासाठी प्रमुख ठिकाणी बाजार न मांडता कदंबा बस स्थानका जवळच्या मोकळया जागेवर तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी आणि पालिका निरीक्षकावर ही जबाबदारी सोपविण्यात यावी अशी सूचना आपण केली होती. शेवटी काणकोणच्या प्रत्येक नागरीकांचे आरोग्य महत्वाचे आहे. सद्या जी या तालुकयात परिस्थिती निर्माण झालेली आहे ती भयानक अशी असून एका बाजूने कोरोनाचे रूग्ण कमी व्हावेत या साठी प्रत्येक जण धडपडत आहे. असे असताना दिवसाला किमान तीघे जण कोरोनाने दगावत आहेत. अशाने रूग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती नगरसेवक रमाकांत ना. गावकर यानी व्यकत केली आहे.