सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही काय खाता यावर बरंच काही अवलंबून असतं. आरोग्याचा मार्ग हा पोटातून जाते हे उगीचच म्हटलं जात नाही. सकाळी उठल्यावर काहीजणी गरम पाणी पितात. काहींना एखादं फळ खाण्याची सवय असते तर काही बदाम, अक्रोड असा सुका मेवा खाण्याला प्राधान्य देतात. काहींच्या दिवसाची सुरूवात चहा-कॉफीनेच होते. मात्र सर्वांगीण आरोग्यासाठी तूप, मिरपूड आणि हळद यांचं एकत्रित सेवन लाभदायी ठरू शकतं. या घटकांच्या सेवनामुळे होणार्या लाभांविषयी…
- चमचाभर तुपात अर्धा चमचा हळद आणि थोडी मिरपूड घाला. सकाळी रिकाम्या पोटी हे मिश्रण खाल्ल्याने त्वचा आणि केसांचं आरोग्य उत्तम रहातं. पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
- तुपात आरोग्यदायी फॅट्स असतात. हा सॅच्युरेटेड फॅट्सचा उत्तम स्रोत आहे. मेंदूच्या पेशींसाठी सॅच्युरेटेड फॅट्सची गरज असते. तुपाच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती सुधारते. यातले आरोग्यदायी फॅट्स तुमचा मूड सुधारायला मदत करतात. एकाग्रता वाढते. तुपात शरीराला आवश्यक असणारे अमिनो ऍसिड्स असतात. तुपामुळे वजनही कमी होतं.
- हळदीत पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. औषध म्हणून हळदीचा वापर केला जातो. यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे बरेच लाभ होऊ शकतात.
- काळी मिरी हा मसाल्याचा पदार्थही पोषणमूल्यांनी समृद्ध आहे. मळमळ, उलटय़ा होत असतील तर काळ्या मिरीचं सेवन करावं. डोकेदुखी आणि मायग्रेनविषयक तक्रारीही काळ्यामिरीमुळे दूर होऊ शकतात.