ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी नव्या बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. मंगळवारी देशात 26 हजार 964 कोरोना रुग्णांची नोंद झाली. 34 हजार 167 रुणांनी कोरोनावर मात केली. तर 383 रुग्णांनी आपले प्राण गमावले. सध्यस्थितीत देशात 3 लाख 1 हजार 989 सक्रिय रुग्ण असून, रुग्णसंख्येचा हा आकडा मागील 186 दिवसातील सर्वात कमी आहे.
देशभरात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 35 हजार 498 रुग्ण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 27 लाख 83 हजार 741 रुग्ण बरे झाले असून, 4 लाख 45 हजार 768 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान, देशात आतापर्यंत 82 कोटी 65 लाख 15 हजार 754 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.