माजी आमदार किरण कांदोळकर यांची माहिती
प्रतिनिधी / म्हापसा
प्रसार माध्यमांनीच पक्षाचे नाव क्रांतिकारी केले. आपण क्रांतिकारी पक्षाचे नाव म्हटले नव्हते. तर क्रांतिकारी लोक आपल्याबरोबर असणार आहे. प्रसार माध्यमाने क्रांतिकारी म्हटल्याने नको ते लोक आपल्यामागे लागले आहे. आमदार विजय सरदेसाईंना आपण भेटलो ते खरे आहे. आता माजी सभापती ऍड. दयानंद नार्वेकर यांनाही भेटणार आहे. अद्याप पक्ष काढलेला नाही. वा पक्षाला नाव ठेवलेले नाही. आम्ही येणाऱया काळात सगळेजण एकत्रित बसून जे गोव्यातील नागरिकांना नाव मान्य असेल त्यावर शिक्कामोर्तब करणार आहोत अशी माहिती थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
अपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केल्यावर ते बोलत होते. आजीमाजी आमदार, मंत्री, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी त्यांना दिवसभर शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना कांदोळकर म्हणाले की, राष्ट्रीय पक्षांना जनता कंटाळली आहे मग भाजपा वा काँग्रेस पक्ष असू द्या. क्षत्रीय राजकारण, स्थानिक पक्ष असे त्यांना येणाऱया काळात वाव आहे अशी माहिती त्यांनी दिली. गोवेकरांची पहिली पसंती आता त्या पक्षांना असेल. सुदीन ढवळीकर, विजय सरदेसाई वा अन्य कोणीही असो. आपण यापुढे त्यांना भेटत राहणार व त्यांच्याबरोबर चर्चा करून एकत्रित येऊन वा संयुक्तपणे अनुभव घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत अशी माहिती कांदोळकर यांनी दिली.
हळर्णकरांनी घमेंडात बोलणे थांबवावे
थिवीचे लोक आपल्या बरोबर आहे असा दावा आमदार हर्ळणकर करीत आहे तर तुमचाही तोच दावा आहे याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, जरी आमदार हर्ळणकर यांनी थिवीचे लोक आपल्याबरोबर आहे असे सांगितले असले तरी येणाऱया काळात थिवीचे लोक काय ते पाहून घेणार आहेत. आपण ओवर कॉन्फिडन्ट होत नाही. थिवीची वा हळदोणची जनता कोणाबरोबर राहणार हे जनताच ठरविणार आहे. कारण जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. मतदार त्यापेक्षाही मोठे असतात. आमदार निळकंठ हळर्णकर यांना स्वतः घमेंड असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. त्यांनी घमेंडात बोलणे थांबवावे कारण येणाऱया काळात थिवी व हळदोणात कांदोळकरच असणार आहेत.
सरकार आम्हाला इस्पितळात येईल याचा विचार नको राज्यात कोविड रुग्ण वाढत आहेत. त्यात दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. 29 वर्षाच्या मुलाला कोविडमुळे मरण आलेले आहे. आम्ही सर्वांनी मोठे अंतर ठेवणे गरजेचे आहे. सरकारने गाईडलाईन दिल्या आहेत त्या पाळाव्या व स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे. आम्ही आजारी पडलो तर सरकार आम्हाला इस्पितळात येईल याचा विचार नको. गोव्यात कोविड रुग्णांना वाईट अनुभव आलेले आहे. सरकार याबाबत अद्याप खंबीर झालेला नाही. गोमंतकीयांनी आता कोविडबरोबर जगण्याची सवय स्वतःला लावून घेतलेली आहे. योग्य अंतर ठेवून आम्ही या महामारीची काळजी घेऊया. असे कांदोळकर यांनी सांगितले. कविता कांदोळकर, सिमरम कांदोळकर व शुभम कांदोळकर यांनी स्वागत केले.