प्रतिनिधी/हुपरी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असतानाही शिरोळ तालुक्यातील टाकळी येथील गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी विजय जाधव (सांगली), ऑग्री ओव्हरसियर जालिंदर ओमराव पाटील (रा. आटपाडी), ऊसतोडणी टोळी ठेकेदार चंद्रकांत महादेव शिंदे, ट्रॅक्टर चालक सिध्देश्वर शेषराव माळी (दोघेही रा. माळ्याची चिंचोली ता. केज जि. बीड) यांनी निष्काळजीपणे टोळीतील मजुरांच्या नियमांचे उल्लंघन करून त्यांची सुरक्षा धोक्यात आणून सचारबंदीचे आदेश धाब्यावर बसवून महेंद्रा ट्रॅक्टर नंबर (MH44 D3319) ने जात असताना हुपरी पोलीस अडवून या चौघांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. दरम्यान टोळीतील सर्व मजूर व ट्रॅक्टर जवाहर कारखान्यावर सोडून त्यांच्या जेवणाची, राहण्याची व औषध उपचाऱ्याची सोय पोलीस निरीक्षक मस्के यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजुरांना जेवण, पाणी, निवारा, चारा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा आदेश देण्यात आला आहे. कारखान्याच्या कामगार, मजुरांना कारखान्यातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या सर्वांना राहत्या ठिकाणी आदेश संपेपर्यंत थांबवण्याची जबाबदारी टोळी ठेकेदाराची आहे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी शेती अधिकारी विजय जाधव व ऑग्री ओव्हरसियर जालिंदर पाटील यांचेवर देण्यात आली आहे.
आज, रविवारी (दि5) सकाळी 10वाजण्याच्या सुमारास गुरुदत्त सहकारी साखर कारखान्याची ग्रामीण भागात वास्तव्यास असणार्या ऊसतोड टोळीचे ठेकेदार चंद्रकांत महादेव शिंदे हे आपली टोळी कायद्याचे उल्लंघन करून घेऊन जात असताना रेंदाळ येथे हुपरी पोलीस ठाण्याचे पी. आय. राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस कॉस्टेबल प्रकाश घाडगे करीत आहेत.