शाहूपुरी / वार्ताहर :
श्री समर्थ नामाचा जयघोष करीत व ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’अशा समर्थराम जयघोषात परळी येथे मानाची कार्तिकी एकादशी भिक्षावळ झाली. दरवर्षी परळी येथे श्री समर्थ सेवामंडळाच्यावतीने या भिक्षावळीचे आयोजन करण्यात येते. सज्जनगडावर कायमस्वरुपी अन्नदान सुरू असते. या अन्नदानासाठी वर्षातून तीन महिने या भिक्षावळ दौऱ्याचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने तीन महिन्यांचा भिक्षावळ दौरा करणार नसल्याची माहिती श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी दिली.
परळी भिक्षावळसाठी सज्ज होते. प्रत्येकाच्या दारात सडा रांगोळ्यांनी अंगण सजले होते. पेठेतील मारुती मंदिरात झोळी पूजन करून भिक्षेस सुरुवात करण्यात आली. पाद्यपूजा करून भिक्षावळ अर्पण केली जात होती.