वार्ताहर / कनुर
सध्या सुगीचा हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे त्यात पावसाने हातातोंडाशी आलेले पीक भिजत असून त्यातच टस्करांकडून भात नाचणी उस पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जात असून मोठ्या प्रमाणात टस्कर नुकसान करणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शिवारात भात कापणी मळणी सुरू असून शिवारात दिवसा कापणी तर रात्री मळणीचे काम सुरू असून तसेच खराब असून ग्रामस्थांना धोका असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
काल रात्री सडेगुडवळे गावच्या आंबेडकर नगर जवळच असणाऱ्या शिवारात लष्कराने धुमाकूळ घातला यामध्ये भारताच्या रचून ठेवलेल्या होळ्या सर्वत्र विस्कटून टाकले आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाताचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर उसात ही मोठ्या प्रमाणात टस्करा ने नुकसान केले आहे.
साडेगुडवले येथील शेतकरी म्हातु भोजू कांबळे, सुरेश नरी गावडे विठ्ठल नरी गावडे भिकाजी तुकाराम झेंडे बाबली पुंडलीक झेंडे लाडू विष्णू गावडे दत्ताराम कुपन्ना गावडे ज्ञानदेव साबाजी गावडे धोंडिबा बाळू गावडे मधुकर मोतीराम झेंडे भीवा बाबली जांबरेकर या शेतकऱ्याचे हातातोंडाशी आलेले पीक या टास्कराने नुकसान केले आहे वन विभागाने या तस्कराला पुन्हा परत पाठवावे अशी मागणी होत आहे.