गुळेली, अडवई, भागात टाळेबंदी सुरू. वाळपई शहरात आजपासुन कडक कारवाई.
प्रतिनिधी
वाळपइ
सत्तरीतील दोन गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील नागरिकांनी व पंचायतीच्या पुढाकाराने तीन दिवस पूर्णपणे टाळेबंदी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दौड पंचायत क्षेत्रातील वडवळ येथील प्रमुख परिसरामध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला असून त्यासंदर्भातील अंमलबजावणी सुरू झालेली आहे. नगरपालिकेने सोमवारपासून मार्गाच्या तत्वांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
दोन दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्मयातील गुळेली व मोर्ले या पंचायत क्षेत्रांमध्ये 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर नागरिकांत खळबळ निर्माण झाली. पैकी एक रुग्ण गुळेली व दुसरा रुग्ण मोर्ले येथील आहे. गुळेली येथील रुग्णा संदर्भात नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगीत तीन दिवस या भागांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे शनिवारपासून भागातील सर्व दुकाने अस्थापन, बँका पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. यासाठी स्थानिक पंचायतीने चांगल्या प्रकारे सहकार्य व पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
अडवई भागात संचारबंदी
दरम्यान भिरोंडा पंचायत क्षेत्रातील आडवई भागात शनिवारपासून संचारबंदी लागू केलेली आहे. स्वतः नागरिकांनी यासाठी सहकार्य केल्यामुळे शनिवारपासून सदर परिसरातील सर्व दुकाने आस्थापने बँका व इतर आस्थापने बंद केलेली आहेत. पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांनी आवाहन केल्यानंतर टाळेबंदी हाती घेण्यात आलेली आहे. यामुळे सर्व प्रकारचे व्यवहार सध्यातरी पूर्णपणे ठप्प असल्याचे माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. सोमवार पर्यंत सदर व्यवहार ठप्प राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे.
वाळपई नगरपालिका कारवाई करणार
दरम्यान सत्तरीतील वेगवेगळय़ा गावात दोन रुग्ण सापडल्यानंतर वाळपई नगरपालिकेचे मंडळ अत्यंत सक्रिय बनले आहे. यासंदर्भात एक खास बैठक आज सकाळी नगरपालिकेच्या कक्षात बोलविली. या बैठकीमध्ये सोमवारपासून शहरांमध्ये आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अख्तर शहा नगरसेवक अनिल काटकर, रामदास शिरोडकर सर्फराज सय्यद, अतुल दातये माजी नगरसेवक शराफत खान व इतरांची खास उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये शहरांमध्ये मास्क न वापरण्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुकानदारांनी सामाजिक अंतरा संदर्भात निर्णयाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. या संदर्भात एक निवेदन सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकाऱयांना सोमवारी सादर करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष शहा यांनी सांगितले.