चलो वाळपई नारा
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयात गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत जमीन मालकीचा प्रश्न अधांतरी राहिलेला आहे. अनेक सरकारे आली मात्र त्यासंदर्भाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. यामुळे आता मेळावली आयटी प्रकल्पावरून तालुक्मयातील नागरिक जमीन मालकीचा प्रश्नासंदर्भात जागरूक झालेले आहे. मंगळवार दि. 26 जानेवारी पासून जमीन मालकी या प्रश्नावरून मोठय़ा मोर्चाला सुरुवात करणार आहेत. यामुळे चलो वाळपई असा संदेश देत असून जनजागृती करण्यात आलेली आहे.
आपल्या अस्तित्वाची जाण ठेवून सत्तरतील जमीन मालकांनी मोठय़ा प्रमाणात या उठावामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वाळपई आयोजित केलेल्या सत्तरीतील समविचारी नागरिकांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेली आहे. यासंदर्भाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात जमीन मालक सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन या संदर्भात या मोर्चाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्ते व जमीन मालक रणजीत राणे सामाजिक कार्यकर्ते अँड. गणपत गावकर राजेश गावकर दशरथ मांदेकर राम मेळेकर पांडुरंग शिवलकर महादेव बागी यांची खास उपस्थिती होती.
मेळावलीमुळे अनेक प्रश्न प्रकाशझोतात
मेळावली येथील आयआयटी प्रकल्पविरोधी आंदोलनामुळे सत्तरी तालुक्मयातील जमिनीतील अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. यामध्ये जमीन मालकीचा प्रश्नाचा खासकरून समावेश आहे. यामुळे ऐतिहासिक उठावाला 26 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे विश्वेश परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
60 वर्षानंतर मोर्चाला होणार सुरुवात.
सामाजिक कार्यकर्ते तथा जमीन मालक रणजीत राणे यांनी यावेळी साठ वर्षानंतर सत्तरी तालुक्मयातील जमीन मालक उठावाच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी मैदानावर उतरत असल्याचे स्पष्ट केले.
स्वतंत्र असुनही पारतंत्र्यात.
राजेश गावकर यांनी सत्तरी तालुक्मयातील जनता स्वतंत्र असूनही पारतंत्र्यात असल्याची भावना निर्माण झालेली आहे. सत्तरी तालुक्मयातील 60 टक्के जागा ही अभयारण्याच्या घशात गेलेली आहे. यामध्ये 32 गावांचा समावेश करण्यात आलेले आहे. पैकी 31 गावातील 40 टक्के जमीन या अभयारण्याच्या घशात गेलेली आहे. जमिनीच्या बाबतीत सरकारने अजून पर्यंत या भागातील जमीन मालकांना अधिकृत कागदपत्रे दिले नाहीत .यामुळे अनेक स्तरावर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती याच माध्यमातून या उठावाला सुरुवात करीत आहोत असे स्पष्ट केले.
मालकी महत्त्वाची आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणपत गावकर यांनी सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले .नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे राजकीय तत्व व मतभेदांना थारा न देता या उठावामध्ये पुन्हा एकदा सहभागी होऊन सरकारला जाग आणण्यासाठी आपले अस्तित्व दाखवून देण्याकरिता उठवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
गुन्हे मागे घेण्याचे आवाहन.
आयआयटी प्रकल्पाच्या आंदोलनप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सदर गुन्हे मागे घ्यावे अशी अनेकवार मागणी केलेली आहे. मात्र सरकारने ते अजून पर्यंत मागे घेतले नाही. आयआयटी प्रकल्प स्थलांतरित करण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र सदर गुन्हे मागे न घेतल्यास व नागरिकावर आणखी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास पुढील आंदोलनाची दिशा 26 जानेवारी रोजी होणाऱया उठावामध्ये निश्चित करण्यात येणार असल्याचे राम मेळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.