धुक्मयामुळे बागायतदारांची चिंता वाढली, मोहोराची नाशाडी होण्याची शक्यता
उदय सावंत/वाळपई
गेले काही दिवस राज्यात पडलेल्या थंडीमुळे यंदा आंबा व काजूला बऱयापैकी मोहर आलेला आहे. यामुळे मुबलक पीक येण्याची शक्मयता असून आंबा व काजू उत्पादकांना यंदा अच्छे दिन येण्याची शक्मयता आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून काही प्रमाणात पडणाऱया धुक्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. वाळपई विभागीय कृषी अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार आंबा व काजूना टी मॉस्किटो हा जंतू हल्ला करू लागल्यामुळे याचा प्रभाव कमी न झाल्यास आंबा व काजू उत्पादन धोक्यात येण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
सध्या आंबा व काजूच्या झाडांना आलेला मोहर पाहून त्याचा सारासार विचार केल्यास यंदा बागायतदारांच्या हातामध्ये चार पैसे अधिक येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. गोव्याच्या कृषी उत्पादनात आंबा व काजूला विशेष महत्त्व आहे. गोव्याच्या बाजारपेठेमध्ये कोटय़वधी रुपयांची उलाढाल याच उत्पादनातून होत असते. सत्तरी तालुक्मयात जवळपास 70 टक्के कुटुंबे आंबा व काजू उत्पादनावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. यंदा काजूच्या झाडांना चांगला मोहोर आलेला असून यामुळे उत्पादन दुपटीने वाढण्याची शक्मयता काजू उत्पादकांनी व्यक्त केली आहे. जवळपास 80 टक्के काजूच्या झाडांना चांगला मोहोर आलेला दिसून येत आहे. तर काहींना मोहोर येण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या आंबा व काजू झाडांना आलेला मोहोर पाहता या उत्पादकांना चांगले दिवस येण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. सध्या बाजारपेठेमध्ये काजू चे दर प्रति किलो 120 ते 125 रुपये आहेत. चांगल्या प्रकारे आंब्याचे उत्पादन झाल्यास उत्पादकांची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणात मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली. मात्र पाऊस गेल्यानंतर काजू झाडांना अचानकपणे भरभरून मोहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर आंब्याला त्याच्यापेक्षा जास्त मोहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. सत्तरी तालुक्मयातील आंबे जवळपास शंभर टक्के मोहराने फुलल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे आंबा बागायतदारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हा मोहरा फळाचे रूपांतर करण्यास यशस्वी ठरल्यास यंदा सर्वसामान्यांना मानकुराद आंब्याची चव चाखण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
धुक्मयामुळे चिंता वाढली
आंबा व काजू झाडाला मोठय़ा प्रमाणत मोहर आला असला तरीसुद्धा गेल्या चार दिवसात काही प्रमाणात धुके पडत आहे. या धुक्मयाचा परिणाम या मोहरावर होण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास उत्पादन घटणार आहे. ही सर्व प्रक्रिया हवामानावर अवलंबून आहे. वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस याच्या म्हणण्यानुसार या मोहरावर आत्ताच जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे आहे. कारण हवामानात बदल झाल्यास व धुक्मयाचे प्रमाण वाढल्यास या मोहरावर विपरीत परिणाम होण्याची शक्मयता आहे. जंतुनाशक औषधांची फवारणी केल्यास ही प्रक्रिया काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. अन्यथा संपूर्ण मोहर नष्ट होण्याची भीती नाकारता येत नाही असे गावस यांनी सांगितले.
मॉस्कीटोचा प्रभाव वाढल्याने धोका : गावस
सत्तरी तालुक्मयात काही भागांमध्ये आंबा व काजू उत्पादनाच्या मोहोरवर टी मॉस्कीटो नामक जंतू हल्ला करू लागले आहेत. यामुळे मोहोरांच्या काही फांद्या
जळू लागल्या आहेत. टी मॉस्कीटो मोहरावर हल्ला करतात व रस शोषून घेतात. यामुळे जैविक शक्ती नष्ट होऊन मोहर जळण्याची प्रक्रिया सुरू होते, असे वाळपई विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.
Ÿसध्या ज्या झाडांना पाणी देणे शक्मय आहे त्या झाडांना पाण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्यास पुन्हा त्या जागी नवीन मोहोर येण्याची शक्मयता आहे. तरीसुद्धा ज्या झाडांना ताजा मोहर आहे त्या झाडावर ताबडतोब जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे असल्याचे विश्वनाथ गावस यांनी सांगितले.