पैकूळ पदपूल पुन्हा पाण्याखाली : म्हादई, रगाडा नदीच्या पातळीत वाढ
प्रतिनिधी / वाळपई
एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सत्तरी तालुक्मयात पुन्हा एकदा पावसाने जोर झालेला आहे. यामुळे म्हादई व रगाडा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पैकूळ पदपूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे. यामुळे पैकूळ ग्रामस्थांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाल्याचे माहिती हाती आली आहे.
सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू होता. चोर्ला व साटरे कोदाळ दरम्यानच्या घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागलेली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत आहे. बुधवारी या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली होती. आज पुन्हा एकदा सकाळी पावसाने जोर धरल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. म्हादई व रगाडा नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत असल्याची माहिती हाती आलेली आहे. यामुळे जलसिंचन खात्याची यंत्रणा सतर्क झाली असून एकूण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रगाडा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे पैकूळ पदपूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे. यामुळे ग्रामस्थांची पुन्हा एकदा अडचण निर्माण झालेली आहे?. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास शुक्रवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्मयता आहे.
दरम्यान, यासंदर्भात जलसिंचन खात्याच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. सध्यातरी कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र रात्रभर पाऊस पडल्यास पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकते. तसे झाल्यास संबंधित भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेली आहे.
कर्नाटक सीमेवर असलेल्या चोर्ला घाट परिसर व कोदाळ साटरे भागातील घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत असून या पाण्याचा प्रवाह नदीत जात असल्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. सध्या तरी सत्तरी तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.