कृषी नुकसानीचे दावे आठ दिवसात सादर करण्याचे आवाहन : सर्व गावातील वीजपुरवठा पूर्वपदावर.,गावातील रस्ते मोकळे.
प्रतिनिधी / वाळपई
गेल्या शनिवारी व रविवारी सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये वादळी वाऱयाचा फटका बसून मोठय़ा प्रमाणात रस्ते बंद होण्याचे प्रकार घडले होते. त्याचप्रमाणे वीजपुरवठा खंडित होण्याच्या व त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले .दरम्यान वीजपुरवठा कार्यालयाच्या कर्मचाऱयांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्व गावातील वीजपुरवठा पूर्वपदावर आलेला आहे. फक्त बंदीरवाडा या ठिकाणी आणखी दोन दिवसांनी वीजपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. तर वेगवेगळय़ा गावातील जंगली झाडे पडून रस्ता बंद झाल्यानंतर वाळपईच्या अग्निशामक दलाच्या जंवानानी केलेल्या कामगिरीमुळे सर्व रस्ते मोकळे झाले असून कोणताही रस्ता बंद नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
विभागीय कृषी कार्यालयाच्या पथकाने वेगवेगळय़ा ठिकाणी भेटी देऊन नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली .विभागीय कृषी अधिकाऱयांनी नुकसानग्रस्त शेतकऱयांनी आपल्या नुकसानीचे दावे आठ दिवसात सादर करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबतची माहिती अशी की शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर वादळी वाऱयाचा फटका बसून सत्तरी तालुक्मयांमध्ये जवळपास तीस लाखांच्या आसपास वित्तहानी झालेली आहे. सर्वात जास्त फटका कृषी व वीज खात्याला बसलेला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसापासून वेगवेगवेगळय़ा खात्यातर्फे समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचे योजना देण्यात येत आहे.
वीजपुरवठा पूर्वपदावर.
दरम्यान वाळपईच्या सहाय्यक वीज अभियत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयातील जवळपास 80 टक्के गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. वेगवेगळय़ा ठिकाणी विजेचे खांब मोडून विजेच्या तारा तुटल्या होत्या. यामुळे अनेक गाव काळोखाचे साम्राज्य पसरले होते .दरम्यान गेल्या दोन दिवसापासून वीज पुरवठा कार्यालयाच्या कर्मचाऱयांचे चांगल्या प्रकारचे सहकार्य व योगदान दिल्यामुळे सावर्डे पंचायत क्षेत्रातील बंदीरवाडा वगळता इतर सर्व गावातील वीजपुरवठा पूर्वपदावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. येणाऱया दोन दिवसात बंदीरवाडा भागातील वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी काम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. वित्त खात्याला जवळपास पंधरा लाखांच्या आसपास नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे .तरीसुद्धा कर्मचाऱयांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केल्यामुळे दोन दिवसात वीजपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी महत्त्वाची मदत झाल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
कृषी बागायतीची मोठी नुकसानी.
दरम्यान या संदर्भात वाळपई विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये वादळी वाऱयाचा पडता बसून कृषी बागायतीची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे. गेल्या दोन दिवसापासून विभागीय कृषी कार्यालयातर्फे कर्मचाऱयांची नियुक्ती करून या संदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे. सदर आढावा दरम्यान मोठय़ा प्रमाणात केळी आंबा सुपारी नारळ यांची प्रामुख्याने नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले .अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडलेली आहेत. त्याचप्रमाणे केळी ागायती मधील मोठय़ा प्रमाणात झाडे उन्मळून पडल्यामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झालेली आहे.
दरम्यान कृषी खात्याच्या वरि÷ अधिकाऱयाकडून आलेल्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीचे प्रस्ताव विभागीय कृषी कार्यालयाकडे छायाचित्रासह आठ दिवसात सादर करण्याचे आवाहन विश्वनाथ गावस यांनी केले आहे .त्यानंतर येणाऱया प्रस्तावावर विचार केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व रस्ते मोकळे–झाटे हटविली.
दरम्यान वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसात जवळपास 25 ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये जाणाऱया रस्त्यावर जंगली झाले पडली होती. त्यामुळे रस्ते बंद झाले होते. दोन दिवसात सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यात आलेले आहेत. यामुळे सर्व गावाचे रस्ते मोकळे झाले असून यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्याचे श्री संतोष गावस यांनी स्पष्ट केलेली आहे .या दोन दिवसात जवळपास पाच लाखांची मालमत्ता वाचविण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. काही ठिकाणी घरावर झाले पडल्यामुळे नुकसानी झाली मात्र बहुतांश गावामध्ये जाणाऱया रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला होता.
पावसाची रिपरिप सुरूच.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची बऱयाच प्रमाणात गोची झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढलेली उष्णता यांच्या पार्श्वभूमीवर पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे हवामानामध्ये गारवा निर्माण झालेला आहे. मंगळवारी संध्याकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली.