गांजे बंधाऱयामुळे समस्या निर्माण झाली : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजित राणेंसमोर अडवई भागातील शेतकऱयांच्या व्यथा
प्रतिनिधी /वाळपई
23 जुलै हा सत्तरी तालुक्मयासाठी काळा दिवस ठरला. गेल्या साठ वर्षात जेवढा जलप्रवाह वाढला नाही तेवढा त्यादिवशी वाढला व सत्तरी तालुक्मयामध्ये हाहाकार माजला. गांजे याठिकाणी जलसिंचन खात्यातर्फे शंभर कोटी खर्चून बंधारा उभारण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱयाच्या खांबामध्ये लाकडी ओंडके अडकल्यामुळे पाण्याला आडकाठी निर्माण झाली. त्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी वाढली. परिणामी सत्तरी तालुक्मयातील अनेक घरांमध्ये पाणी घुसून घरे कोसळली, अनेकांचे संसार पाण्यामध्ये बुडाले, घरातील सामानाची, कृषी बागायतीचे प्रचंड नुकसानी झाली. हा प्रकार पूर्णपणे मानवनिर्मित असल्याच्या आरोप अडवई येथील सावईकर कुटुंबियांनी केला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व आरोग्यमंत्री विश्वजित राणे सरकारच्या विविध खात्याच्या प्रमुख अधिकाऱयांसमवेत आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
अडवई भागात भेट.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्वप्रथम वाळपई येथील भाजपा कार्यालयामध्ये वेगवेगळे खात्याच्या प्रमुख अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये एकूण सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सत्तरी तालुक्मयातील पूरग्रस्त भागाच्या दौऱयाला सुरुवात केली. प्रथम सावईकर यांच्या घराची पाहणी केली. 23 जुलै रोजी या घरांमध्ये पूर्णपणे पाणी भरले व अनेक वर्षाचे जुने घर भुईसपाट झाले. सावईकर कुटुंबीयांनी सांगितले की गुरूवारची रात्र ही सावईकर कुटुंबीयांसाठी काळ ठरली. कारण या घरांमध्ये पूर्णपणे पाणी भरले होते व आपले अनेक वर्षाचे घर पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. एवढय़ा प्रमाणात पाणी येण्याचे कारणच काय अशा सवाल केला व यासाठी गांजे याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या बंधारा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा बंधारा येणाऱया काळासाठी सत्तरी तालुक्मयाकरिता दूर्देवी ठरणार असून सरकारने उपायोजनेची प्रक्रिया आतापासूनच सुरू करणे गरजेचे आहे अशा प्रकारची मागणी केली.
शेती बागायतीची मोठी हानी.
या पुरामुळे भागातील शेती बागायतीचे प्रचंड हानी झालेली आहे. सुपारी व मिरी उत्पादनाला बऱयाच प्रमाणात फटका बसलेला आहे. दरवषी आपणाला जवळपास 400 किलो मिरचीचे उत्पादन होत असते. यंदा मात्र 50 किलो सुद्धा उत्पादन होणे कठीण आहे. सरकारची यंत्रणा सर्वेक्षण करून 10 हजार रुपयांची मदत देणार आहे. हा शेतकरी वर्गासाठी पूर्णपणे खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे. कबाड कष्ट करून उत्पादित केलेली कुळागरे पाण्याच्या खाली जाऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असेल तर तरुणपिढी या क्षेत्राकडे कशी वळणार असा सवाल त्यांनी मंत्र्यांसमोर उपस्थित केला.
शक्मय तेवढय़ाप्रमाणात मदतीसाठी प्रयत्न करणार–श्रीपाद नाईक. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून व त्यापुढे वेगळी व्यवस्था करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण यासंदर्भात अहवाल गोवा सरकारच्या जिल्हाधिकाऱयांमार्फत केंद्राला सादर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्षपणे बोलणी करून गोव्याला वेगळय़ा प्रकारची आर्थिक तरतूद करण्यासंदर्भात आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्तरी तालुक्मयांमध्ये निर्माण झालेली नैसर्गिक आपत्ती हे खरोखर दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.