रुग्ण संख्या पोचली 250च्या वर : दुसऱया लाटेचा पहिला बळी : वाळपई आठवडा बाजारात नियमांना हरताळ
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयात कोरोना रुग्णांची संख्या 250 च्यावर जाऊन पोचली आहे. जवळपास सर्वच पंचायत क्षेत्रात कोरोनाचे संक्रमण वाढलेले असून आज मंगळवार या आठवडी बाजारामध्ये नियमांना साफ हरताळ फासल्याचे निदर्शनास आले. सामाजिक अंतरांचा फज्जा उडाला. कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये सत्तरी तालुक्मयातील पहिला बळी गेलेला आहे. मासोर्डे येथील एका 42 वषीय व्यक्तीचे मंगळवारी पहाटे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाने निधन झाले. त्यामुळे वाळपई भागामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सत्तरी तालुक्मयांमध्ये वाढणारी रुग्णांची संख्या याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक संचारबंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
सत्तरी तालुका उत्तर गोव्यात शेवटच्या टोकाला असला तालुक्यात जवळपास 80 टक्के गावांमध्ये कोरोना संक्रमण सुरू झाले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागलेली आहे. गेल्या दोन दिवसांत जवळपास 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. हे रुग्ण विशेषतः ग्रामीण भागातील आहे. यामुळे कोरोना फक्त शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागात झळ पोचली आहे. आता ग्रामीण भागातील जनतेने अधिक सावध राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
वाळपई आठवडी बाजारात सामाजिक अंतराचा फज्जा
एका बाजूने सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे वाळपई आठवडी बाजार बंद करावा, अशी मागणी सातत्याने करताना दिसत आहे. मात्र वाळपई नगरपालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आज वाळपई आठवडी बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये पूर्णपणे सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे येणाऱया काळात शहरांमध्ये रुग्ण संख्या आणखी झपाटय़ाने वाढल्यास त्याला जबाबदार कोण़? असा सवाल तमाम नागरिकांनी केलेला आहे. दरम्याने तलाठी तुळशीदास मांदेकर यांनी अनेक ठिकाणी फिरून सामाजिक अंतरांचे पालन करावे, सर्वांनी मुख्यपट्टी वापरावी अशा प्रकारचे वारंवार आवाहन केले. तरीही या आवाहनाला नागरिकांकाडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही..
दरम्यान या बाजारामध्ये फेरफटका मारला असता काही नागरिकांनी तोंडावयर मास्क बांधले होते. मात्र भाजी, फळविपेते, कपडा विपेते मात्र मास्क न लावता गिऱहाईकांशी व्यवहार करत होते. वाळपई नगरपालिकेच्या वतीने काही प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र ही कारवाई तात्पूरती स्वरूपाची ठरली.
कडक संचारबंदी करा !
गोव्यात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सत्तरी तालुक्मयात हा आकडा 250 पेक्षा जास्त होऊ लागलेला आहे. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोवा सरकारने आता तरी संचारबंदीचा निर्णय घ्यावा, अशा मागणी नागरिकांनी केली आहे. शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांनी कडक लॉकडाऊन सुरू केली आहे. गोव्यात संचारबंदी का लागू केली जात नाही? असा सवाल तमाम नागरिकांतून केला जात आहे.