वाळपई / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून सत्तरी तालुक्मयात प्रचंड प्रमाणात पडणाऱया पाऊस व वादळी वाऱयामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोसाटय़ाचा वारा यामुळे कृषी बागयतीच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून आज सकाळी गोवा बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरामध्ये दरडी कोसळून वाहतूक तीन तास ठप्प होण्याचे प्रकार घडला .मात्र सदर अडचणी दूर करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत पुर्ववत सुरू करण्यात आली आहे.
वाळवंटी नदीला पूर
केरी सत्तरी भागातील वाळवंटी नदीला पूर आला आहे. सकाळपासून वाळवंटी नदी आक्रमक अवस्थेत वाहत होती. घोटेली याठिकाणी असलेल्या पुलावरून पाणी गेल्यामुळे शेजारील घरांमध्ये पाणी घुसण्याचा प्रकार घडला. माजी सरपंच वसंत गावस लक्ष्मण मापारी यांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे काही प्रमाणात नुकसानी झाली .त्याप्रमाणे काही नागरिकांच्या संरक्षण भिंती कोसळल्या असून यामुळे नुकसान सहन करावी लागली .
याभागातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी असलेल्या बंधाऱयांना झाडे अडकल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाण्याचासाठा तुंंबला व ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. सदर नदी वीर्डी भागातून वाहत असून सदर भागामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या नदीच्या पाण्याचा प्रवाहात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
गोशाळेत पाणी घुसले.
दरम्यान नाणूस याठिकाणी असलेल्या अखिल विश्व गोसंवर्धन केंद्राच्या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी घुसून नुकसानी झाली आहे. शेजारून वाहत असलेल्या ओहोळाला मोठय़ा प्रमाणात पाणी आले होते. गेल्या अनेक वर्षापासून सदर ठिकाणी संरक्षक भिंतीची उभारणी करावी अशा प्रकारची मागणी सातत्याने करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे .सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार ईशांत सावंत नगराध्यक्ष अख्तर शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन या संदर्भात पाहणी केली . याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱया नगरपालिका मंडळाच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करून त्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष शहा यांनी स्पष्ट केले आहे.
नानोडा पाणी प्रकल्प बुडाला.
सत्तरी तालुक्मयातील नानोडा या ठिकाणी असलेला पाणी प्रकल्प बुडाला आला आहे. सदर भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा साठा झाला व यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यापाण्यात प्रकल्पाच्या शेजारून म्हादई नदीचे पात्र आहे. नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आल्यामुळे या प्रकल्पाची पूर्ण यंत्रणा पाण्याखाली गेली असून मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता पाणी पुरवठा खात्याने व्यक्त केली आहे.
अचानकपणे लागलेल्या पावसामुळे पाण्याचा अंदाज आला नाही व मोठय़ा प्रमाणात पाणी वाढल्यामुळे हा प्रकार घडल्याचे खात्याचे अधिकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
वीज पुरवठा ठप्प-पाणी पुरवठय़ावर परिणाम.
दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱयाचा फटका बसलेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझड झालेली आहे .यामुळे सत्तरी तालुक्मयातील वीज यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक ठिकाणी खांब मोडल्यामुळे वीज वाहिन्यांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेली आहे. मंगळवारी रात्रीपासून अनेक गावातील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की दाबोस पाणी प्रकल्पाला वीजपुरवठा ठप्प होण्याच्या प्रकाराचा मोठा फटका बसलेला आहे. यामुळे अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला असून पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे माहिती हाती आली आहे .सातत्याने वीजपुरवठा गायब होण्याचे प्रकार यामुळे या प्रकल्पाची यंत्रणा बंद पडलेली आहे. याचा प्रतिकूल परिणाम पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ावर झाल्याचे सहाय्यक अभियंता प्रशांत गावडे यांनी स्पष्ट केले.
वेळूस,रगाडा, नद्यांची पुरसदृष्य स्थिती.
दरम्यान घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील अनेक नद्या पूरसदृश्य परिस्थिती पहावयास मिळत आहे. वेळूस नदीला प्रचंड पाणी आल्यामुळे याचा फटका शेजारी असलेल्या कुळागाराना झालेला आहे. त्याचमुळे रगाडा नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्यामुळे गांजे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. त्याचप्रमाणे वाळपई शहरातून दावाकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला बऱयाच प्रमाणात फटका बसल्याची माहिती हाती आली आहे.
पाली साकव वाहून गेले.
तरुणांना फोटो डिस्टिनेशन म्हणून ओळखले जाणारे पाल सत्तरी येथील दोन लाकडी साकव वाहून गेले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने सदर साकव वाहून गेले. यामुळे गेल्या काही दिवसापासून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱया साकव सर्वांच्या आवडीचे ठरत होते .आता वाहून गेल्यामुळे तरुणांची बऱयाच प्रमाणात गोची होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
मामलेदाराकंडून पाहणी. दरम्यान सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार ईशांत सावंत यांनी भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला .केरी त्याच प्रमाणे म्हादई नदीच्या अनेक धोकादायक ठिकाणावर जाऊन त्याने प्रत्यक्षपणे पाहणी केली .वाळपई गोशाळेत पाणी घुसल्यामुळे निर्माण झालेले गंभीर स्वरूपाची परिस्थिती याची त्यांनी पाहणी केली .संबंधित तलाठय़ाना यासंदर्भात नुकसानभरपाईचे अर्ज सादर करण्यासंदर्भात नागरिकांशी संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.