साटे गावातील महिला भगिनींचा वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा.
वाळपई/ प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयात पिण्याच्या पाण्याची समस्या आता हळूहळू उग्र होऊ लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक गावातील नागरिक व खासकरून महिला भगिनी पिण्याच्या पाण्याच्या समस्या घेऊन वाळपई पाणी पुरवठा क कार्यालयात येत आहेत. आजही नगरगाव पंचायत क्षेतातील साटे गावातील महिला भगिनी यांनी वाळपई पाणी पुरवठा कार्यालय घेऊन तीन महिन्यापासून भेडसावणाऱया पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आक्रमक रूप धारण केले. तीन महिन्यापासून या भागातील जनता अक्षःरश पाण्यासाठी हाल काढीत आहेत .नजीक असलेल्या नदीच्या पाण्यावर सध्या आपली गरज भागवत असून ही परिस्थिती न सुधारल्यास या नदीच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील साटे गावात तीन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे आज मोठय़ा प्रमाणात महिला भगिनी पाणी पुरवठा कार्यालयात गरज देऊन यासंदर्भात अधिकाऱयांची आक्रमक पद्धतीने चर्चा केली. येणाऱया महिन्यात समस्या अधिक उग्र होण्याची शक्मयता असल्यामुळे आता ही समस्या निकालात काढा अशा प्रकारची मागणी महिला भगिनी यावेळी केली. या चर्चेमध्ये भाग घेताना कनि÷ अभियंता गणेश गावकर यांनी सांगितले की टँकरच्या माध्यमातून सध्यातरी पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र याला महिला भगिनी तीव्र स्वरूपात विरोध केला व कायमस्वरूपी पाण्याची सुविधा उपलब्ध करा अशा प्रकारचे मागणी लावून धरली. त्यानंतर माळोली भागातून जलवाहिनी जोडून पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर स्थानिक पत्रकारना माहिती देताना महिला भगिनी सांगितले की
नांदुरा भागामध्ये कार्यान्वति असलेल्या पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा पावसाळी मोसमात वाहून गेलेली आहे.
सदर यंत्रणा कार्यान्वति करण्यासाठी किमान दहा दिवसांचा अवधी लागणार आहे तोपर्यंत माळवलि भागातून जलवाहिनी जोडून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिल्याचे यावेळी महिला आंदोलकांनी स्पष्ट केले.
नदीचे पाणी नको.
दरम्यान सदर गावातील नागरिकांना नदीचे पाणी देण्याचे प्रयत्न पाणीपुरवठा खात्याकडून होत आहेत मात्र सदर नदीमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आहे गेल्या वषी एक बैल मरून तो पाण्यात पडला होता अशा प्रकारचे पाणी आम्ही वापरले यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही यामुळे नदीचे पाणी न देता शुद्ध केलेले पाणी द्यावे अशा प्रकारची मागणी आम्ही अधिकाऱयांकडे केलेली आहे अशा प्रकारचे माहिती आंदोलकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तर तीन महिन्यापासून बिले कशी.
गेल्या तीन महिन्यापासून नळाना अजिबात पाणी येत नाही बिले मात्र पाणीपुरवठा कार्यालयाकडून येत आहेत. पाणी नसताना बिले आम्ही का भरावीत अशाप्रकारचा सवाल महिला भगिनींनी केला आहे .आतापर्यंत हजारो रुपये आम्ही बिलाच्या माध्यमातून सरकारकडे दिलेले आहेत. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या अजिबात सुटलेली नाही .अशा प्रकारचा सवाल महिला भगिनी केला .सरकारला बिले हवी असल्यास सुद्धा पाणी द्या अशा प्रकारची मागणी यावेळी केली.
रमेश गणेश गावकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दोन दिवसापूर्वी पाणीपुरवठा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता नितीन नेवरेकर यांनी सदर भागांमध्ये भेट देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. या भागामध्ये समाधानकारक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा या संदर्भात प्रयत्न सुरू असून दहा दिवसात या भागातील पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याचे गणेश गावकर यांनी स्पष्ट केले.