वाळपईत गारांचा पाऊस : घरांची छप्परे उडाली : केळी बागायतींचे मोठे नुकसान : वीजपुरवठा गायब
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयात आज सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागाला वादळी वाऱयाचा फटका बसून मोठे नुकसान झाले. याचा जास्त प्रमाणात फटका नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा भागाला बसला असून येथील अनेक घरांची छपरे उडाली तर शेती, बागायतींचे मोठे नुकसान झाले काही भागांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे गारांचा पाऊसही पडला.
सकाळपासून हवामानात अत्यंत उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडण्याची शक्मयता वर्तविण्यात येत होती. सायंकाळी सुमारे 5.30 च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. सर्वप्रथम ठाणे पंचायत क्षेत्रातील अनेत गावांमध्ये व नंतर कोपर्डे व इतर ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. वाळपईत सुमारे पंधरा मिनिटे जोरदारपणे पाऊस लागला. यावेळी अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. अर्धा तास लागलेल्या या पावसाचा जबरदस्त फटका वाळपई लागला. वाळपई नगरपालिका क्षेत्रातील सत्तरी तालुका शेतकरी सोसायटी नजीक असलेल्या पुलावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते त्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. नाणूस दाबोस आदी ठिकाणी जाणाऱया रस्त्यालगत असणारी झाडे कोसळल्यामुळे येथील रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी अनेक ठिकाणी पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरू केले होते. अनेक ठिकाणी हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
नानोडा भागात जोरदार वादळी वारा
तालुक्मयातील
नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा,
माळोली, बांबर, कोदाळ या
भागाला वादळी वाऱयाचा जबरदस्त फटका बसला. यामुळे घरांची मोठय़ा
प्रमाणात पडझड झाली. नानोडा येथील तुळशिदास गुरव यांच्या घराचे
छप्पर उडून गेल्यामुळे त्यांचे सुमारे एक लाखाची नुकसानी झाले. त्याचप्रमाणे याच गावातील प्राथमिक शाळेतील पाण्याच्या टाकीवरील छप्पर उडून
गेले असून याठिकाणी असलेल्या पाणी
प्रकल्पालाचे नुकसान
झाले. या भागातील अनेक घरांना वादळी वाऱयामुळे झालेल्या नुकसानीची झळ बसली असून सुमारे
पाच लाखांवर नुकसान झाल्याची शक्यता आहे. या वादळी वाऱयासह झालेल्या
अवकाळी पावसामुळे या भागातील घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे स्थानिक पंचायत
सभासद प्रशांत मराठे यांनी सांगितले.
पाडेली भागातही घरांचे नुकसान
भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पाडली गावातही मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. या गावातील लवू गावकर यांच्या घराचे छप्पर पूर्णपणे उडाले असून यामुळे त्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी प्रसंगावधान राखून घरातील कुटुंबियांनी घराबाहेर पळ काढल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. पाडली गावातील अनेक प्रमुख रस्त्यांवर झाडे पडून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. गावचे सरपंच उदयसिंह राणे यांनी पुढाकार घेऊन सदर रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले होते हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
केळी बागायतींचे मोठे नुकसान
वादळी वाऱयासह व गाऱयासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका या भागातील बागायतींना बसला असून बागायतदारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. नानोडा भागातील प्रशांत मराठे, सुनील मराठे, मंदार मराठे यांच्या बागायतीतील केळी, नारळ आंबे, फणस यांची मोठे नुकसान झाले. या वादळी वाऱयामुळे फळे जमिनीवर पडली होती. भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई, शिंगणे आदी भागातीलही शेती व बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. अडवई येथील सयाजी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार अडवईत रस्त्यालगत असणारी अनेक झाडे कोसळून रस्ते बंद झाले होते. सत्तरी तालुक्मयात लाखोंची हानी झाली आहे.
वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित
सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. यातील अनेक झाडे वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे वीज विभागाचेही नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावांमध्ये काळोख पसरला होता. रस्ते मोकळे करण्यासाठी वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरू केलेले काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.