वाळपई/ प्रतिनिधी
सरकारने कोटय़वधी खर्च करून पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी वेगवेगळय़ा नद्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱयाच्या फळय़ा फोडून पाणी वाया जाण्यास भाग घेण्याचे प्रकार सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात घडू लागले आहेत .त्यामुळे सध्यातरी वाळपई जलसिंचन खात्याच्या अधिकारी वर्गावर मोठय़ा प्रमाणात ताण निर्माण होत असून येणाऱया काळात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. अशा नागरिकावर जलसिंचन खात्याच्या अधिकाऱयांनी कठोर कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलावीत अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांनी केलेली आहे.
त्याचप्रमाणे अशा प्रकारचे कृत्य करणाऱया नागरिकांचा शोध घ्यावा व त्यांना जनतेसमोर आणावे अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांनी केलेली आहे .
याबाबतची माहिती अशी की गोवा सरकारच्या जलसिंचन खात्यातर्फे पाणी आडवा पाणी जिरवा या उद्देशातर्गत सत्तरी तालुक्मयातील अनेक नद्यावर मोठय़ा प्रमाणात बंधाऱयांची माळ बांधलेली आहे . गेल्या काही वर्षापासून या बंधाऱयाच्या माध्यमातून पाण्याचा साठा करून तो शेतकरी बांधवांपर्यंत पोचविण्याचे काम उपसा योजनेअंतर्गत करण्यात येत आहे .पावसाळा संपला की लोखंडी फळय़ा घालून बंधाऱयाच्या माध्यमातून पाण्याचा साठा करण्यात येत असतो .यामुळे आज सत्तरी तालुक्मयातील हजारो चौरस मीटर जमीन पाण्याखाली आलेली आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या लागवडीला या पाण्याच्या माध्यमातून प्रोत्साहन प्राप्त झालेले आहे.
फळय़ा फोडून पाणी सोडण्याचे प्रकार.
दरम्यान या संदर्भात शेतकरी बांधवाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही बंधाऱयाच्या फळय़ा फोडून भरलेल्या साठा खाली करण्याचे षडयंत्र काही भागातून सुरू असल्याचे समजते. यंदा चांगल्या प्रकारे जलसिंचन खात्यातर्फे पाण्याचा साठा केलेला आहे. यंदा अनेकठिकाणी नव्या लोखंडी फळय़ा वापरून पाणी अडविण्यासाठी जलसिंचन खात्यातर्फे लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे .मात्र दुर्दैवाची बाब अशी की काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पाण्याचा साठा झाला असताना सुद्धा सदर बंधाऱयाच्या फळय़ा काढून पाणी सोडून देणे तर अनेक ठिकाणी लोखंडी फळय़ा मोडण्याचे प्रकार वाढलेले आहेत . यामुळे आजही मोठय़ा प्रमाणात अनेक बंधाऱयातील पाण्याचा साठा पूर्णपणे कमी झालेला आहे.
तर पुढच्या महिन्यात पाण्याचा तुटवडा.
दरम्यान अशा प्रकारचा प्रतिकूल परिणाम येणाऱया काळात शेतकरी बांधवांना भोगावे लागणार आहेत. अनेक बंधाऱयातील पाण्याचा साठा बऱयाच प्रमाणात कमी झालेला आहे. यामुळे मे महिन्यामध्ये या पाण्याच्या साठय़ावर चालणाऱया उपसा योजना बंद पडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास कृषी बागायतीवर मोठय़ा प्रमाणात संक्रांत निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास शेतकरी बांधवांना याचा बऱयाच प्रमाणात फटका बसणार आहे. मे महिन्यामध्ये कृषी बागायतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. या महिन्यामध्ये पाण्याची कमतरता भासल्यास कृषी बागायती पूर्णपणे सुकून जाण्याची भीती शेतकरी बांधवांनी व्यक्त केलेली आहे.
रेती उपसा करण्यासाठी फळय़ांची नासधूस.
दरम्यान यासंदर्भात शेतकरी बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार काही बंधाऱयांच्या पात्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात रेतीचा साठा झालेला आहे. हा साठा बेकायदेशीररित्या काढण्यासाठी हा व्यवसाय करणारे काही व्यवसायिक बंधाऱयाच्या फळय़ा काढून पाणी सोडण्याचे काम करीत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे बंधाराच्या पात्रातील पाणी कमी झाल्यास मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बेकायदेशीर रेती उत्खननाचे काम हाती घेण्यास मदत होणार आहे. यामुळे बंधाऱयांच्या फळांची मोठय़ा प्रमाणात नासधूस सुरू असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.
अशा प्रकाराविरोधात कारवाई करणार.
जलसिंचन खाते.
दरम्यान या संदर्भात वाळपई जलसिंचन खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी बंधाऱयांच्या फळांची नासधूस होत असल्याचे प्रकार मान्य केले. मात्र याबाबत जलसिंचन खात्याची यंत्रणा अजिबात गप्प बसणार नाही. ज्याठिकाणी पाण्याची नासधूस केलेली आहे सदर ठिकाणी चौकशी सुरू असून यासंदर्भात अनेकांची नावे पुढे आलेली आहेत. त्या संदर्भाची रीतसर तक्रार पोलिस स्थानकावर करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नसल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेली आहे .सरकारने कोटय़ावधी खर्च करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे व शेतकरी बांधवांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बंधाऱयाची माळ उभारलेली आहे. यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे.
बेकायदेशीर रेती उत्खननासाठी जर असे प्रकार होत असतील तर ही खरोखरच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे जलसिंचन खात्याच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.