उमेदवारांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्याने छाननीला वेळ : पात्र, अपात्र उमेदवारांची यादी आज जाहीर होणार,16 मे रोजी निवडणूक.
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारानी सादर केलेल्या अर्जाची छाननी पूर्ण करण्यास अधिकाऱयांना कटकटी सहन करावे लागत आहे. एकूण 24 उमेदवारांपैकी प्रत्येकाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. यामुळे या तक्रारीची शहानिशा करून उमेदवाराचे अर्ज वैद्य की अवैध ठरवावे लागणार आहेत. यामुळे वैद्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीच्या एकूण अकरा संचालकांसाठी 16 मे रोजी सहकार खात्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कार्यक्रमानुसार 16 मे रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 27 एप्रिल हा शेवटचा दिवस होता. या दिवशी एकूण अकरा जागांसाठी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये भाग क्रमांक एक मधून धनंजय देसाई, दशरथ गावस, तुकाराम खोत, कांता गावकर, अफसर खान, विलासराव राणे, झेरो गावकर, पांडुरंग गावस, शहाजी देसाई, सगुण वाडकर, अशोक नाईक, नासिर खान, प्रदीप गंवडळकर, नारायण गावकर अनिल काटकर रोशन देसाई सुरंगा नाईक यांचा समावेश आहे.
तर भाग क्रमांक 2 मधून 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात गणपत गावकर, दशरथ मांदेकर, श्रीकांत नार्वेकर, उदयसिंग राणे, सीताराम देसाई, रमेश कुडाळकर पांडुरंग नाईक यांचा समावेश आहे
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर 28 एप्रिल पासून छाननी प्रक्रिया सुरू केलेली आहे. डिचोली विभागाच्या उपनिबंधकामार्फत छाननी प्रक्रिया सुरू आहे. काही जणांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आलेले आहेत तर काही अर्ज अजूनही निर्णयाविना आहेत. अनेक उमेदवारांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. काही उमेदवार हे अनेक बँकांमध्ये थकबाकीदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांनी आपली सत्य माहिती लपविलेली आहे. यामुळे परस्परांनी प्रत्येकाच्या विरोधात तक्रार दाखल केलेल्या आहेत. यामुळे निवडणूक अधिकारी पंकज मराठे यांच्यावर दडपण निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या निवडणुकीतील दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची सर्व कायद्याच्या बाजूने पडताळणी केल्यास अनेकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास योग्य उमेदवार शिल्लक राहणार आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी उमेदवारांनी भाऊगर्दी केल्यामुळे आता ही निवडणूक निश्चित प्रमाणात होणार अशी चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान सोमवार दिनांक 3 मे रोजी संध्याकाळी तीन पर्यंत उमेदवारांची पात्र यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पात्र-अपात्र उमेदवारांची नावे प्रसिद्ध होणार आहेत. याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेले आहेत. सत्तरी तालुका शेतकरी सोसायटी सत्तरी तालुक्मयाच्या सर्व ग्रामीण भागाशी संलग्नित आहे. जवळपास आठ हजार पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.
कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी सध्या गोव्यात व सत्तरी तालुक्मयांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी करणारे निवेदन सहकार खात्याला सादर केलेले आहे. या संस्थेशी संलग्न असलेले अनेक मतदार हे ज्ये÷ नागरिक आहेत. यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून रुग्णाची संख्या आणखीन वाढू नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी व ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.