प्रतिनिधी/ सातारा
सदरबाजार येथे सुमित्राराजे भोसले ग्रंथालयाच्या पाठीमागील उघडय़ा गटारात नागरिक कचरा टाकत आहेत.त्यामुळे गटार तुंबत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने डास उत्पन्नाची निर्माण केंद्र तयार होत आहेत.स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिकेने गटर बंदिस्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
सातारा शहरात सदरबाजार येथे नेहमीच स्वच्छतेचे तीन तेरा वाजत असतात.काही नागरिक कचरा करण्यात माहिर असतात.नगरसेवक सातत्याने आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.मात्र,काही लोक जाणीवपूर्वक चुकीचे वर्तन करतात.सुमित्राराजे भोसले उद्यानाच्या पाठीमागे गटारात काही लोक घाण करतात.त्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे.डास निर्माण झाले आहेत.आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.याकडे पालिकेने बंदिस्त गटर बांधून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.गटारात टाकलेला कचरा काढण्यासाठी पालिका कर्मचायाची पुरती दमछाक होत आहे.