नगर / प्रतिनिधी :
मागील सरकारच्या काळात सरपंच व नगरपालिकांचे नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेतून करण्याचा घाट घातला गेला. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात हा निर्णय झाला. त्यास सर्वप्रथम आपणच विरोध केला. आता सरपंचांची निवड जनतेतून होण्याऐवजी सदस्यांतून होईल. तसा शासन निर्णय लवकरात-लवकर निघावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात पार पडली. त्यानंतर मुश्रीफ बोलत होते.
नगरमधील जिह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. जिह्यात तब्बल एक हजार शाळेच्या खोल्यांची कमतरता असल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. जिह्यातील विकासाची प्रक्रिया गतिमान केली जाईल. पालकमंत्री या नात्याने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जिह्याचा विकास गतिमान करू, अशी ठाम ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे दिली. आता सरपंचांची निवड जनतेतून होण्याऐवजी सदस्यांतून होईल. तसा शासन निर्णय लवकरात-लवकर निघावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रद्धा, सबुरी हवी
साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या सुरू असलेल्या वादाकडे लक्ष वेधले असता याबाबत साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा, सबुरीची शिकवण सर्वांनीच लक्षात घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुकडी कालवा दुरुस्तीचा सर्व्हे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.