प्रतिनिधी / मडगाव
भाजपला येत्या विधानसभा निवडणुकांत समोर दिसत असलेल्या पराभवाने प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होत आहे असा पलटवार काँग्रेस प्रवक्त्या पल्लवी भगत यांनी केला आहे.
काल मडगावात भाजप अध्यक्ष्यांनी दिगंबर कामत यांना पक्षांतरावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रवक्त्यांनी सदानंद शेट तानावडे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे ज्ये÷ नेते व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपमधुन काँग्रेस पक्षाच पक्षातंर केले नव्हते. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून मडगांवकराकडे आपल्या निर्णयावर मतदानाचा कौल मागितला होता व लोकांना त्यांना विजयी केले होते.
सन 2005 च्या पोट निवडणुकीनंतर 2007, 2012 तसेच 2017 मध्ये मडगावकर मतदारांच्या भक्कम पाठिंब्याने दिगंबर कामत लोक प्रतिनीधी म्हणुन निवडून आले आहेत. आगामी निवडणुकीतही ते प्रचंड मताधिक्याने निवडून येणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असे पल्लवी भगत यांनी म्हटले आहे.
‘फेक सही’ फेम सदानंद तानावडे 2007 पासून एक ही निवडणूक जिंकलेले नाहीत असा टोला पल्लवी भगत यांनी हाणला आहे.
गोव्यात भाजप सरकारने लोकांचा जनादेश डालवून व विश्वासघात करुनच प्रत्येक वेळी सत्ता संपादन केली आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे पक्षांतराचे प्रणेते होते. दिगंबर कामत यांचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न त्यांनी 2007 ते 2012 या काळात दोनदा केला होता याची आठवण पल्लवी भगत यांनी करुन दिली आहे.
लोकांचा आदर करणारे व कोणत्याही वेळी प्रसंगाला पावणारे दिगंबर कामत यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांची जनमानसातील प्रतिमा पाहून स्व. मनोहर पर्रीकरांना दिगंबर कामतांचा हेवा वाटायचा. भाजप प्रदेशाध्यक्षांनी मनोहर पर्रिकर हे दिगंबर कामतांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नरत होते हे स्पष्ट केल्याने दिगंबर कामत यांनी त्यावेळी भाजप सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे स्पष्ट झालाचा दावा पल्लवी भगत यांनी केला आहे.
मडगावात दिगंबर कामत विजयी झाल्यास आपण राजकारण संन्यास घेणार अशी घोषणा स्व. मनोहर पर्रीकर यांनी सन 2005च्या पोटनिवडणुकीवेळी लोहिया मैदानावर केली होती याची आठवण त्यांचा वारसा पुढे नेण्याची भाषा करणाऱयांनी लक्षात ठेवावी असे पल्लवी भगत यांनी म्हटले आहे.
ााजपने खोटारडेपणा करुनच गोव्यात सत्ता संपादन केली आहे. लोकांचा जनादेश चोरुन व पक्षांतरे घडवून आणून भाजप सरकारने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पक्षांतराला पुर्णविराम देण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणारे विधेयक आगामी विधानसभेत मांडण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडेनी केलेल्या वक्तव्याने भारतीय जनता पार्टी पक्षांतराला आळा घालण्यास तयार नसल्याचे व त्यांना घोडा बाजार चालूच ठेवायचा असल्याचे स्पष्ट होत आहे.
आगामी निवडणुकीत मडगावात उमेदवार नव्हे तर पक्षाच्या चिन्हावर प्रचार करणार असल्याचे सदानंद शेट तानावडेंच्या वक्तव्याने भाजपची राजकीय दिवाळखोरी समोर आली आहे. भाजपची ‘लूट अज’ निशाणी लोकांना मागील णव वर्षातील भाजपच्या गैरकारभाराची व लुटमारीची आठवण करुन देत राहील असा टोला पल्लवी भगत यांनी हाणला आहे.