प्रतिनिधी/ बेळगाव
सदाशिवनगर परिसरातील गटारींची स्वच्छता करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली नाही. याचा फटका नागरीकांना बसत आहे. शिवालय मंदिर रोडवर सीडी ब्लॉक झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही परिणामी रस्त्यावर पाण्याचे तळे साचले असल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरत आहे.
शहर आणि उपनगरातील गटारी स्वच्छ करण्याची मोहीम पावसाळय़ाच्या पार्श्वभुमिवर सुरू करण्यात आली होती. पण ही मोहीम दोन दिवसातच बंद करण्यात आल्याने गटारींची स्वच्छता झालीच नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचुन सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सदाशिवनगर परिसरातील गटारींची स्वच्छता करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे या परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. मागील पावसाळय़ात अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने माजी नगरसेविका सरला हेरेकर यांनी आंदोलन छेडून महापालिकेच्या अधिकाऱयांना पळो की सळो केले होते. स्वत: थांबून तुंबलेली सीडी स्वच्छ करून समस्येचे निवारण केले होते. असे प्रसंग महापालिकेच्या अधिकाऱयांवर येवून देखील अधिकारी गाफील आहेत.
सदाशिवनगर परिसरात मागील वषी प्रमाणेच ही समस्या निर्माण झाली असून, सीडीमध्ये कचरा अडकल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. रस्त्यावर एक फूट ते दीड फूट पाणी साचत असल्याने परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत आहे. सदाशिव अपार्टमेंट ते रेलनगर कॉर्नरपर्यंतच्या गटारी पूर्णपणे भरल्या असून, याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांच्या विरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.