प्रतिनिधी/ बेळगाव
बोगस हिस्सा तयार करून जमिनीचे एनए लेआऊट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मूळ जागा मालकाने जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश एडीएलआर यांना दिला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून एडीएलआर कार्यालयातील अधिकारी आणि बोगसगिरी करणाऱया एजंटांची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे.
सदाशिवनगर येथील नवीन मुकुंद प्रभू यांची 17 गुंठे जागा आहे. त्या जागेमध्ये नवीन हिस्सा तयार करून रामसिंग शंकरसिंग रजपूत याने या जमिनीचा एनए व लेआऊट केला होता. यापूर्वीही 32 गुंठय़ांच्या जमिनीमध्येही असाच प्रकार रामसिंग शंकरसिंग रजपूत याने केला आहे. नवीन प्रभू यांनी उतारा काढल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यामध्ये एडीएलआर कार्यालयातील तत्कालीन अधिकारी सामील असल्याचे उघडकीस आले.
या घटनेनंतर नवीन प्रभू यांनी आपली सर्व कागदपत्रे जोडून या प्रकाराबद्दल जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. 32 गुंठय़ांबाबत नवीन हिस्सा 3 व 4 असा तयार करण्यात आला होता. आरटीआयअंतर्गत माहिती मागितल्यानंतर 3 व 4 हिस्साच नाही, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे भू-माफिया आणि अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. 32 गुंठय़ांच्या प्रकरणानंतर पुन्हा 17 गुंठय़ांच्या जागेमध्येही हाच प्रकार करण्यात आला. ए/3 असा हिस्सा करण्यात आला. अधिकाऱयांनी पीटी सीटमध्ये फेरफार करून हा प्रकार घडविला आहे.
सदाशिवनगर येथे खुल्या जागेमध्ये असे प्रकार घडत असून भू-माफिया एडीएलआर कार्यालयातील अधिकाऱयांना हाताशी धरून असे प्रकार करत आहेत. अशा प्रकारांमुळे अनेक जागामालक अडचणीत येत आहेत. तेव्हा अशा भू-माफियांवर आणि अधिकाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. सदाशिवनगर येथील नवीन प्रभू यांचा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये ए/1, ए/2 असा हिस्सा क्रमांक आहे. असे असताना हिस्सा क्रमांक ए/3 दाखवून ही बोगसगिरी केली आहे.
हिस्सा क्रमांक 3 व 4 नसतानादेखील पीटी सीटमध्ये फेरफार करून हा प्रकार करण्यात आला आहे. याप्रकरणी नवीन प्रभू यांनी जिल्हाधिकाऱयांबरोबरच वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार दिल्यामुळे भू-माफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकाऱयांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱयांबरोबर भू-माफियांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत, अशी मागणी होत आहे.