बेळगाव : प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी शहरात बसथांब्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र बसथांब्याचे छप्परच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदाशिवनगर मेन येथील बसथांब्याची दुरवस्था झाली असून ही परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून जै से थे आहे. येथील बसथांब्याचे छप्पर वाऱयाने उडून गेले आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बसथांब्याचे छप्पर नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात थांबणे गैरसोयीचे ठरत आहे. तसेच पाऊस आल्यावर पावसाचे पाणी बस थांब्यावर असलेल्या आसनावर पडत असल्याने प्रवाशांना बसायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबरोबरच या बसथांब्याचे छप्पर एका बाजूने मोडकळीस आले आहे. त्यामुळे ते कधी प्रवाशांच्या अंगावर कोसळेल याची शाश्वती नाही. यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी येथील बसथांब्याची दुरुस्ती करावी व प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
Previous Articleन्यायालयाच्या आवारासमोर भर उन्हात पक्षकार ताटकळतच
Next Article शिक्षकच करताहेत शाळेची स्वच्छता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.