यशाची हमखास खात्री देणारे फलंदाज आणि गोलंदाज गैरहजर असताना, कर्णधाराने कौटुंबिक कारणासाठी देश गाठला असताना आणि अवघ्या एक कसोटी आधी संघाने ऐतिहासिक निचांकी पातळीच्या कामगिरीचे दर्शन घडवलेले असताना हंगामी कर्णधार अजिंक्मय रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारून भारताची लाज राखली आहे. लौकिकार्थाने 26 डिसेंबरला होणाऱया कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हटले जाते. ही कसोटी जिंकणे हाच मुळात एक मोठा पराक्रम आहे आणि त्यातही आधीच्या सामन्यात सर्वात निचांकी 36 धावसंख्येच्या मानसिक खच्चीकरणानंतर त्या धक्क्यातून सावरत मिळवलेला हा विजय आणि तोही सर्व हंगामी खेळाडूंनी साधलेल्या कामगिरीने म्हणजे कौतुकाचा ट्रिपल डोसच! भारताला मेलबर्नवरील आपले आव्हान कायम ठेवता आले आहे. हे जितके महत्त्वाचे तेवढाच कर्णधार आणि मुख्य फलंदाज असणारा विराट कोहली, यशाची खात्री असणारे अष्टपैलू खेळाडू रोहित आणि इशांत शर्मा, महमद शमी यांची अनुपस्थिती, जखमी उमेश यादव अशी स्थिती असताना मिळालेले हे अजोड यश आहे. दोन उदयोन्मुख खेळाडू आणि तीन वेळा हंगामी कर्णधार म्हणून कामगिरी केलेला अजिंक्मय रहाणे यांनी खेळाडूंच्या थेट मेंदूशी खेळ करणाऱया ऑस्ट्रेलियन संघाला चांगला चकवा दिला. ही कामगिरी पुढची अनेक वर्षे क्रिकेट रसिक विसरू शकणार नाहीत. अजिंक्मय रहाणेच्या नेतृत्वाखालील ही तिसरी हंगामी तरीही 100 टक्के यशस्वी कामगिरी ठरली आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उठून भारतीय संघाने यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियन संघाला हा मोठा धक्का ठरणार आहे. स्लेजिंगच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करायचे, त्याला उद्विग्न करायचे आणि आपल्या जाळय़ात पकडायचे ही ऑस्ट्रेलियन संघाची जुनीच खेळी. पहिल्या कसोटीत भारताची झालेली स्थिती पाहता मेलबर्नवरील सामना एकतर्फी होईल असेच ऑस्ट्रेलियाला वाटले असणार. पण या सामन्याने चारलेली धूळ ऑस्ट्रेलियाच्या सहज पचनी पडणार नाही. नवख्या खेळाडूंनी आधीच्या पराभवाचा ताण मनावर न घेता अत्यंत कुशलतेने आणि चिवट झुंज देऊन मिळवलेल्या यशाने भल्याभल्यांना हादरून सोडले नसेल तरच नवल. क्रिकेटमध्ये असे रोमांचक प्रसंग अनेकदा घडतात आणि परिस्थिती कस लागलेले नवे नवे खेळाडू उसळून वर येतात हे क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा दिसले आहे. त्यादृष्टीने भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंची कामगिरी म्हणजे भारताला याहून अधिक उज्ज्वल भविष्यकाळ आहे याची चुणूक दाखवणारा ठरला आहे. मेलबर्नवरील कामगिरीने भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या क्रिकेट सामन्याची आठवण ताजी झाली आहे. तेव्हासुद्धा विराट अनुपस्थित होता आणि अजिंक्मय हंगामी कर्णधार बनला होता. एक-एक अशी बरोबरीत कसोटी चालली होती आणि भारतासाठी ती जिंकणे महत्त्वाचे ठरले होते. अजिंक्मय रहाणे याचेच ते कल्पक नेतृत्व होते, ज्याने हा सामना आपल्या कष्टाने खिशात घातला. अजिंक्मय रहाणे हा मुंबईकर म्हणून झाडून साऱया मुंबईकर समीक्षकांनी त्याचे आणि सामन्याचे कौतुक करणे क्रमप्राप्तच ठरते. मुंबईकर असला की त्याचे कौतुक थोडे जास्तच होते पण यावेळी अजिंक्मयचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तो मुंबईचा नसता तरीही जगभरातील समीक्षकांनी त्याचे कौतुक केले असते. तसे कौतुक आताही सर्वजण करतच आहेत. मात्र यावेळच्या त्याच्या विजयात त्याच्या वैयक्तिक कामगिरीइतकेच कर्णधार म्हणून त्याने बजावलेल्या भूमिकेचे स्थान महत्त्वाचे आहे. पाच गोलंदाज खेळवण्याच्या त्याच्या निर्णयाने उमेश यादवची कमतरता जाणवली नाही. खुद्द अजिंक्मयने झळकवलेल्या शतकामुळे भारताला पहिल्या डावात आघाडी मिळाली जी विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली. वलयांकित चेहरे संघात नसताना आणि ऍडलेडमधील कसोटीच्या इतिहासातील दारुण स्थितीची पूर्वपीठिका असताना अजिंक्मयच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मारलेली उसळी भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. आयसीसी विश्व अजिंक्मयपद कसोटीच्या तालिकेवर भारत आणि ऑस्ट्रेलियन संघात डान्सिंग स्पर्धा आहे. पाठोपाठ संधी साधायला न्यूझीलंड संघ टपला आहे. अशा स्थितीत भारताने आपले आव्हान कायम राखणे हे कौतुकास्पद आहे. रहाणे आणि जडेजा यांनी पहिल्या डावात केलेली शतकी भागीदारी मोठी निर्णायक होती. वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सहाव्या-सातव्या स्थानावर येऊन असे आव्हान देणे मोठे धाडसाचे होते. दुसऱया डावात अजिंक्मयला साथ देणाऱया शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी केली त्यालाही तोड नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या भूमीवर अशा नवख्या खेळाडुंनी आव्हान देणे त्यांनी स्वप्नातही कल्पिले नसेल. भविष्यात अनेकदा स्वप्नात त्यांना गिल दिसला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मोहम्मद सिराज, शुभमन गिल, कप्तान म्हणून अजिंक्मय रहाणे ही भारताला मिळालेली नव्या युगाची देणगी आहे. बंगळुरू, धरमशाला आणि मेलबर्न अशी अजिंक्मयची उंचावलेली कामगिरी, यापूर्वी एकदा त्याने मेलबर्नमध्ये झळकावले शतक त्याच्यातील चिवट खेळाडूचे दर्शन घडवणारे आहेत. भारतीय क्रिकेट संघाने असेच सदैव ’अजिंक्मय राहणे’ भारतीयांना अपेक्षित आहे. जागतिक क्रिकेटमध्येही असे रोमहर्षक प्रसंग निर्माण करणाऱया या खेळाडूंची वाहवा होत राहणार आहे. मोठे नाव असणारे खेळाडू नाहीत म्हणून संघ गडगडतो ही अंधश्रद्धा वाटावी अशी कामगिरी हंगामी खेळाडूंना घेऊन भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवली आहे. टी -20, वन डे अजिंक्मयपद चषकावर आपले नाव कोरल्या नंतर आता हा भारतीय संघ कसोटी अजिंक्मयपदाचे शिखरही सर करायच्या तयारीला लागला आहे. नव्या वर्षात या यशाला गवसणी घातली की भारताची गणना एकेकाळच्या यशस्वी ऑस्ट्रेलिया संघाप्रमाणे होणार आहे. एखाद्या दारूण पराभवानंतर असा रोमहर्षक विजय प्राप्त होणे ती काळाची गरज बनली होती आणि ती गरज हंगामी खेळाडूंनी पूर्ण करून दाखवली हे भारताच्या दृष्टीने नक्कीच आशादायक असे चित्र आहे.
Previous Articleकोरोना : दिल्लीत 677 नवे रुग्ण ; 21 मृत्यू
Next Article अपघातात धामणेचा तरुण जखमी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.