बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास गरज पडल्यास लॉकडाऊनबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते, असे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बिदरमध्ये पत्रकारांशी बोलताना हे संकेत दिले. तसेच नागरिकांनी त्यांच्याच फायद्यासाठी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. काळजी घेतली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागलीत असे म्हंटले आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्ह्यास आवश्यक वाटल्यास लॉकडाउनची अंमलबजावणी करावी लागेल असेही त्यांनी म्हण्टले आहे. परंतु सध्यातरी लॉकडाऊन लावण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांविषयीही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोललो. मी त्यांना सांगितले की ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनोचे प्रमाण वाढत आहे तेथे आम्ही नाईट कर्फ्यू लावला आहे. दरम्यान राज्यातील काही शहरात नाईट कर्फ्यू आहे आणि परिस्थिती आणखी बिकट झाल्यास आम्ही पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय घेऊ. आता कोणत्याही लॉकडाऊनचा विचार केला जात नाही. आम्ही आठवडाभरानंतर ही परिस्थिती पाहू आणि निर्णय घेऊ, ‘असे म्हंटले.दरम्यान राज्य तांत्रिक सल्लागार समितीने राज्यातील काही भागांत थोड्या वेळा लॉकडाउनची शिफारस केली आहे.
जनतेने सहकार्य करणे गरजेचे
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी फेस मास्क घालावे, हँड सॅनिटायझर्स वापरावे आणि सामाजिक अंतर राखले पाहिजे. लोकांनी सहकार्य न केल्यास आम्ही कठोर उपाययोजना करू. तांत्रिक सल्लागार समितीने लॉकडाऊन करण्याची शिफारस केली का असे विचारले असता येडियुरप्पा यांनी लोकांना थेट परिस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे लागेल, असे सांगत थेट उत्तर देणे टाळले.
दरम्यान राज्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. राज्यात रविवारी कोरोनाने १० हजाराच्यावर वर मजल मारली होती. दरम्यान सोमवारीही कोरोनाने १० हजारपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास राज्य सरकारला लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय नाही.