कासगंजमध्ये मुख्यमंत्री योगींचा घणाघात
उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारने श्रद्धेचा आदर केला आहे. दिव्य अयोध्या, काशी विश्वनाथच्या विकासासह सोरोंला तीर्थस्थळ घोषित करत येथील विकासाची जबाबदारी घेतली आहे. या पावन भूमीवर जन्म घेता आला हे येथील लोकांचे सौभाग्य आहे. भाजप सरकारने गुंडगिरी मोडून काढली असून महिलांच्या सन्मानासाठी अनेक कामे केली आहेत. राज्याला दंगलमुक्त करण्यात आले असून आता कांवड यात्रा संचारबंदीशिवाय निघत असल्याचे योगी म्हणाले.
तीर्थांचा विकास, अलीगढमध्ये विमानतळ, एटामध्ये वैद्यकीय महाविद्यालय हे विकासाचे मॉडेल आहे. शेतकरी, विधवा, दिव्यांगांना पेन्शन दिली जात आहे. पीएम-सीएम आवास योजनेचा लाभ दिला जातोय. पुन्हा सत्तेवर आल्यास 2 कोटी लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. समाजवादी पक्षाची सहानुभूती ही दहशतवाद्यांसोबत आहे, गरीबांबद्दल सपला सहानुभूती नसल्याचा दावा योगींनी केला आहे.