अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 20 सप्टें. 2021 स. 11.15
● रविवारी 174 जणांचा अहवाल बाधित
● एकूण 7,640 जणांची तपासणी
● पुन्हा वाढ 200 च्या खाली घसरली
● अल्प वाढीतही चढ-उतार सुरूच
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात रविवारी गणेश चतुर्दशीचा उत्साह सुरू होता. आपल्या लाडक्या बाप्पाला नागरिक नियम सांभाळत भक्तीपूर्ण निरोप देत होते आणि बाप्पाला विनवत होते, ‘बाप्पा हे करूनच संकट लवकर टळू दे’, बाप्पाने ही प्रार्थना कदाचित ऐकली असावी त्यामुळे रविवारी रात्रीच्या अहवालात गत पाच महिन्यातील नीचांकी बाधित वाढ समोर आल्याचा मोठा दिलासा मिळालेला आहे. खूप दिवसांनी फक्त 174 एवढी नीचांकी बाधित संख्येची नोंद झालेली आहे.
रविवारी रात्री आलेल्या अहवालात बाधित वाढ पुन्हा 200 च्या खाली घसरली असून गत चार महिन्यांतील निच्चांकी बाधितवाढ नोंदवली गेली आहे. गणेशोत्सवात हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा लाभला असून सप्टेंबर महिन्यात स्थिती आटोक्यात येत असल्याचंं चित्र दिसत आहे.
रविवारी अहवालात 174 बाधित
आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आणि सोमवारची सकाळ दिलासादायक ठरली कारण रविवारी रात्रीचा अहवाल आला. त्यामध्ये गता 5 महिन्यांतील नीच्चांकी 174 बाधित वाढ समोर आली. यामध्ये एकूण 7 हजार 640 जणांची तपासणी करण्यात आलेली असून यामुळे जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी दराचा आलेख ही 2.00 टक्के वर स्थिर झालेला आहे.
दर रविवारी आलेख घसरतो
गत 5 महिन्यातील कोरोना संसर्गाचा आढावा पाहिला तर दर रविवारी बाधित वाढीचा आलेख खालीच बसलेला असतो. कारण तपासण्या कमी झालेल्या असतात. मात्र तरी देखील सप्टेंबर मधील हा तिसरा रविवार असा आहे की तपासण्या जास्त होऊन देखील बाधित वाढ कमी आलेली असून पॉझिटिव्हिटी दर खाली घसरल्याचा मोठा दिलासा आहे.
आकडेवारीत पारदर्शकता हवीय
आयसीएमआरच्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची आकडेवारी सध्या कमी नोंद आहे. तर जिल्ह्यात प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अहवालात येणारे आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आहे. याचा अर्थ अद्यापही आकडेवारी वेळेवर अपलोड केली जात नाही. प्रशासनाने हे मान्य करून देखील त्यात दिरंगाई सुरूच आहे. त्यामुळेच मध्यंतरी मृत्यूदराचा फुगवटा निर्माण झाला होता. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली होती. मात्र ‘तरुण भारत’ने त्यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता मृत्यूची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर घटली व मृत्यू दराचा आलेख दिलासादायकरित्या खाली घसरलेला असल्याने लोकांच्या मनातील भीती कमी झालेले आहे.
आता पुन्हा जबाबदारी सर्वांचीच
मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर आटोक्यात येत नव्हता. सातत्याने दोन हजार अडीच हजार अशा संख्येने बाधितांच्या आकडा वाढत होता. त्यानंतरच्या कालावधीत स्थिती प्रचंड पॅनिक झालेली असताना ही आकडेवारी हजार दीड हजार यादरम्यान येऊ लागली. मात्र संसर्ग आटोक्यात येत असताना हे आकडे नेमके कोठून येतात? आणि त्यामुळे या आकडेवारीवरून जिल्ह्यावर लॉकडाउन लादला गेला होता. हा आकडेवारीचा अपलोड घोटाळा आणि बेशिस्त संपवण्यासाठी पुन्हा दोन महिने आरोग्य विभागाला लागले. लॅब खाजगी कोविड हॉस्पिटल व शासकीय हॉस्पिटल या सर्वांना नोटिसा काढण्याची वेळ आली. आता सप्टेंबर महिन्यात बाधित वाढीचा, मृत्यू दराचा फुगवटा संपलेला आहे. पॉझिटिव्हिटी दरही खाली आलेला आहे. त्यामुळे लवकरच या संकटातून सर्वांचीच मुक्तता व्हावी व जिल्हा कोरुना मुक्त व्हावा हीच जिल्हावासियांची भावना आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण तपासणी 19,90,695
एकूण बाधित 2,46,264
एकूण कोरोनामुक्त 2,36,094
एकूण मृत्यू 6,043
एकूण उपचारार्थ 7,098
रविवारी जिल्हय़ात
बाधित 271
मुक्त 271
मृत्यू 02