प्रतिनिधी / बेळगाव
रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या समर्थ अर्बन को-ऑप पेडिट सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 114 कोटींच्या ठेवी, 95 कोटींची कर्जे तर 1 कोटी 5 लाख रुपयांचे भाग भांडवल असून सोसायटीला यावषी 63 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती चेअरमन नरहरी डी. जोशी यांनी दिली.
समर्थ सोसायटीची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली. अध्यक्षस्थानी नरहरी जोशी होते. स्वागत संस्थेचे सेपेटरी अरविंद कुलकर्णी यांनी केले. चेअरमन नरहरी जोशी व व्हा. चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक सादर करून मंजुरी घेण्यात आली. नफ्याची विभागणी आणि लाभांश मंजूर केल्यानंतर आगामी वर्षासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. तसेच स्थानिक ऑडिटची नियुक्तीही केली आहे.
संस्थेकडे 4 कोटी 90 लाख 90 हजार राखीव निधी असून 23 कोटी 76 लाख 50 हजारांची गुंतवणूक करण्यात आली आहे. वैयक्तिक हायपोथीकेशन, तारण, गव्हर्मेंट सेक्मयुरेटी, सुवर्ण, शैक्षणिक, कॅश पेडिट आणि ठेवीवरील कर्ज अशी एकंदर 95 कोटी 30 लाखांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. संस्थेकडे 1 कोटी 86 लाखांच्या स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. रौप्यमहोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रौप्यमहोत्सवानिमित्त 25 महिन्यांच्या कालावधीसाठी राबविलेल्या विशिष्ट योजनेला बेळगावकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असेही जोशी यांनी सांगितले.
संस्थेची मारुती गल्लीतील मुख्य शाखा, ए-चन्नम्मानगर शाखा आणि शहापूर शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत असून लवकरच टिळकवाडीची शाखाही स्वतःच्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सोसायटीच्या विस्तारासाठी सहकार खात्याने परवानगी दिली असून लवकरच खानापूर शहरात शाखा सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल सोसायटीने केली आहे. हे सर्व सभासदांच्या विश्वासामुळेच शक्मय झाले आहे, असे चेअरमन जोशी यांनी सांगितले.
यावेळी संचालक अजय सुनाळकर, सुनंदा आळतेकर, छाया जोशी, गणपत कुलकर्णी, प्रदीपकुमार कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, विनायक जोशी, अनिल भंडारी, परशुराम कांबळे, उमेश सुणगार, अशोक पुजेरी, राघवेंद्र केशनूर उपस्थित होते. व्हा. चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी आभार मानले.