राष्ट्रचेतना संमेलनात स्वामी दुर्गानंद गिरी यांचे उद्गार
प्रतिनिधी/ पणजी
प्रत्येक माणसामध्ये राष्ट्रचेतना ठरवून जागी करता येत नाही तर ती अंगी असते. माणूस जन्माला येतो तो एक हेतू घेऊनच. आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून आपण कसा विचार करतो यावर आपले जीवन अवलंबून आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांनीही अलौकिक गोष्टी केलेल्या आहेत हे विसरुन चालणार नाही. प्राणी आणि माणसांमध्ये ‘धर्म’ हा एक विशेष फ्ढरक आहे. हा बंधु, भगिनी, पितृ, मातृधर्म पशु व पक्षांमध्ये पाहायला मिळत नाही. समाजाला धारण करणे म्हणजे धर्म, असे उद्गार स्वामी दुर्गानंद गिरी यांनी काढले.
राष्ट्रीय विचार मंचतफ्xढ काल रविवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रचेतना संमेलनात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विचार मंचचे अध्यक्ष डॉ. भिवा मळीक, संयोजक अवधूत कामत, सहसंयोजक प्रा. दत्ता नाईक, सहसंयोजक प्रा. प्रविण नेसवणकर, भारत माता की जय संघटनेच्या उत्तर गोवा महिला प्रमुख शेफ्ढाली नार्वेकर, दक्षिण गोवा महिला प्रमुख डॉ. मानसी प्रभुदेसाई आणि सर्व तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विविध विषयांवर चर्चासत्र
संमेलनाच्या सुरुवातीस पूर्वसैनिकांची ओवाळणी करण्यात आली. संमेलनात चर्चासत्र घेण्यात आले असून स्वाती केरकर यांनी कुटंब, मातृशक्ती या विषयावर आपले विचार व्यक्त केले तर प्रवीण नाईक यांनी युवाशक्ती, गोविंद देव यांनी शैक्षणिक, अवधूत कामत यांनी सामाजिक आणि प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय विषयावर भाष्य केले.
शिक्षकांनी भांडण समाजासमोर दाखवू नये : कामत
अवधूत कामत यांनी सांगितले की, समाज हा आत्मपेंद्रीत झाला आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले काम करु पाहणाऱया शिक्षकांना खुद्द इतर शिक्षकही बऱयाचदा मदत करत नाहीत. याचा परिणाम विद्यार्थी व समाजावर होतो. आपापसातले भांडण शिक्षकांनी समाजासमोर दाखवू नये.
कुटुंबव्यवस्था हा समाजव्यवस्थेचा कणा : केरकर
स्वाती केरकर म्हणाल्या की कुटुंबव्यवस्था हा समाजव्यवस्थेचा कणा आहे. गोविंद देव यांनीही शिक्षण क्षेत्राल बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रविण नाईक म्हणाले की एखादा लोकप्रतिनिधी आपला आदर्श नेता असू नये.
चांगल्या व्यक्तीला समाज सहकार्य करत नाही : वेलिंगकर
प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, जो पक्ष समाजासाठी काम करेल त्याला सहकार्य करणार, असे पं. दीनदयाळ उपाध्यय यांनी पुर्वीच सांगितले होते. पक्ष जनकल्याणासाठी नसेल तर त्याला संपवून दुसरा पक्ष स्थापन करणार अशी त्यांची भूमिका होती. ज्यांना धंदा करायचा आहे त्यांनी राजकारण करावे. आज चांगल्या व्यक्तीला राजकारणात स्थान नाही. त्याला समाज सहकार्य करत नाही. महीला मंडळ आणि युवकांना आपल्या मंडळ व संघासाठी पैसे पाहिजे असतात पण चांगली व्यक्ती हे देणार नाही हेही त्यांना माहीत असते, म्हणून मग ते स्वार्थी माणसाला जवळ करतात, असेही ते म्हणाले.
देश-गोव्यासंदर्भात चार ठराव संमत
संमेलनात उपस्थित कार्यकर्त्यांच्या अनुमोदनाने म्हादई रक्षण, मातृभाषा रक्षण, देशहिताचे कायदे व निर्णयाचे अभिनंदन आणि गोव्याच्या प्रतिमेच्या विकृतीकरणाचे निषेध असे चार ठराव संमत करण्यात आले.
अनेक दिवंगत व्यक्तींना वाहिली श्रद्धांजली
त्याचप्रमाणे दिवंगत झालेले प. पू. पेजावर मठाधीश श्रीविश्चेशतीर्थ, स्वातंत्र्यवीर मोहन रानडे, माजी संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, समाजसेवक वै. दामोदर नरसिंह तथा मोहनदास नाईक, शिक्षणतज्ञ पद्मश्री सुरेश आमोणकर, समाजसेवक अशोक मांद्रेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पर्वरी येथील मिसबा शेख या विद्यार्थीनींनी संस्कृत विषयात 94 टक्के गुण मिळविल्याने तिचा सत्कार करण्यात आला.
दारुमुक्त गाव करणाऱया संस्थांचा गौरव
सुर्ला नागरिक कृती समितीने पुढाकार घेऊन सत्तरी तालुक्यातील सुर्ला गाव दारुमुक्त केल्याने व श्री महालक्ष्मी वंस पचायतन महिला मंडळ हाळी चांदेल पेडणे येथील गाव दारुमुक्त केल्याने दोन्ही संस्थांचा गौरव करण्यात आला.
शिक्षकांना समाजिक परिस्थितीच माहीत नसते
चर्चासत्रात शिक्षक कसा असावा हा एक महत्त्वाचा विषय मांडण्यात आला. चर्चेत असे दिसून आले की शिक्षकांना असे वाटते की 8 तासच आपण शिक्षक आहोत. शिक्षक हा 24 तासही शिक्षकच असतो. तो एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्याला सामाजाचे भान असणे गरजेचे आहे तसेच समाजातील समस्याही त्याला ठावूक हव्यात. बहुतेक शिक्षकांना समाजिक परिस्थिती ठाऊक नसते. जिथे शिक्षकांनाच काही माहीत नाही तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार? एक शिक्षक चांगले काम करायला पुढे आला तर दुसरा त्याचे पाय खेचतो. शिक्षकांनी आपला हा स्वभाव बदलणे गरजेचे आहे, अशी सडेतोड तसेच वास्तवदर्शी चर्चा यावेळी झाली.