प्रतिनिधी/वडूज
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर समाजा जागृतीसाठी पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे मत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केली.
वडूज येथील जिल्हा बँकेत आयोजित केलेल्या पत्रकारांच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वडूजचे माजी नगरसेवक अभय देशमुख, विकास अधिकारी श्री. देसाई दाजी, जायगावंचे युवा उद्योजक सचिन देशमुख उपस्थित होते.
श्री. घार्गे म्हणाले, कोरोना आजाराने संपुर्ण जगात हाहाकार माजला आहे. अद्याप खटाव-माण तालुक्यात या आजाराची कसलीही लागन झाली नाही. म्हणून लोकांनी गाफील राहता कामा नये. आपल्या नजीकच्या कराड, कोरेगांव, फलटण, कडेगांव या तालुक्यात आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. अश्या परस्थितीत सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणा, महसूल खाते, आरोग्य खाते व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी आपापल्या पध्दतीने काम करीत आहेत. परंतू प्रशासकीय कामास काही अंशी मर्यादा येत असतात. अश्यावेळी गांव पातळीवर काम करणारे प्रामाणिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बारमाही जनतेची बांधिलकी मानणार्या पत्रकार बांधवांनी कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आजची परस्थिती पाहता काही दिवसात आजार आटोपात येईल अशी शक्यता नाही. संपुर्ण आजाराचे उच्चाटन होण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत वाट पहावी लागू शकते. तसेच या प्रादुर्भावामुळे पर्यटन, हॉटेल, इंडस्ट्रीज, व्यवसायाला दीर्घ काळ परिणाम सोसावे लागणार आहेत. अश्या परस्थितीत लोकांची मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारांनी महत्वाची भूमिका करणे गरजेचे आहे. यावेळी श्री. घार्गे यांच्याहस्ते पत्रकारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप तसेच जेष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख यांचा एकसष्ठी निमित्त सन्मान करण्यात आला.
धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आयाज मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. नम्रता भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार प्रतापराव माने, पोपटराव मिंड, महेश गिजरे, अविनाश कदम, संजय देशमुख, राजेंद्र शिंदे, केशव कचरे, प्रकाश राजेघाडगे, समीर तांबोळी, मुन्ना मुल्ला, धनंजय चिंचकर, निलेश कणसे, केदार जोशी, नितीन राऊत, आकाश यादव, किरण देशमुख, दत्ता कोळी, दत्ता इनामदार, शरद कदम, नदीम मुल्ला, जे. के. काळे, विठ्ठल नलवडे, ऋषीकेश पवार आदी उपस्थित होते.