अनुभव आणि अनुभूती यांच्या मिश्रणातूनच चांगल्या साहित्याची निर्मिती करता येऊ शकते. फक्त अनुभव आणि अनुभूती या दोन गोष्टी स्वतंत्र काढून साहित्याची निर्मिती करता येईल असे वाटत नाही. मग या सगळय़ा पार्श्वभूमीवर विचार करताना समकालीन वास्तव हा महत्त्वाचा भाग ठरतो.
‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हे सदर सुमारे सहा वर्षे सातत्याने लिहिले गेले आणि त्याला सोशल मीडियातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. यातील अनेक लेखांवर मते मतांतरे व्यक्त झाली. त्यांना इथे प्रसिद्धीही दिली गेली. समकालीन प्रश्न आणि त्यांचा ऊहापोह या पाक्षिक सदरामध्ये केला गेला. याचे कारण समकालीन जगण्याची गुंतागुंत समजून घेणे आणि त्यातील अंतर्विरोध मांडणे. हा या सगळय़ामागचा हेतू होता. अनेक नामवंत लेखकांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्मया आणि पुढील लेखनाला प्रेरणा देणाऱया होत्या. या लेखकांमध्ये अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कवी वसंत आबाजी डहाके, साहित्य अकादमी विजेते ज्ये÷ लेखक डॉ. राजन गवस, ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख, नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्र्रमुख डॉ प्रमोद मुनघाटे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, कादंबरीकार प्र्रवीण बांदेकर, सुशील धसकटे, नाटककार प्रेमानंद गज्वी, जयंत पवार, विचारशील रंगकर्मी अतुल पेठे, वामन पंडित, विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे अशा अनेकांचा सहभाग होता. त्यामुळे हे सदर वैचारिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ ठेवण्याच्या दृष्टीने प्र्रामाणिकपणे लेखन करण्यात आले. हे सर्व लेखन साहित्याच्या विविध वाङ्मय प्र्रकारातील असले तरी या सगळय़ाच्या केंद्रस्थानी कविता होती. याचे कारण एकच, सगळय़ा वाङ्मय प्र्रकारात कविता हा वाङ्मय प्रकार श्रे÷ असल्याचे अभ्यासक मानतात. मात्र आता या सदराचा समारोप करण्याची वेळ आली असून सांस्कृतिक महाराष्ट्रमधील हे शेवटचे लेखन आहे.
अनुभव आणि अनुभूती यांच्या मिश्रणातूनच चांगल्या साहित्याची निर्मिती करता येऊ शकते. फक्त अनुभव आणि अनुभूती या दोन गोष्टी स्वतंत्र काढून साहित्याची निर्मिती करता येईल असे वाटत नाही. मग या सगळय़ा पार्श्वभूमीवर विचार करताना समकालीन वास्तव हा महत्त्वाचा भाग ठरतो. कोणत्याही भाषेत उत्तम साहित्य निर्मिती झाली, त्याचा विचार केला तर त्या साहित्यात त्या काळाचा एक धगा आपल्याला सापडतोच. तुमच्यासमोर उभा राहिलेला काळ तुम्ही समजून घेतला नाही तर तुम्ही खोटय़ा आभासी जगात जगत आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे फक्त कल्पनेतून साहित्याची निर्मिती करणे कसे शक्मय आहे? अगदी समजा मनोरंजनपर साहित्य लिहायचे असेल तरी लिहिणारा लेखक तो स्वतःच्या त्यावेळच्या जगण्याचा एक धागाच पकडून लिहित असतो. त्यामुळे समकालीन वास्तव हा त्या त्यावेळच्या निर्मितीवेळेस महत्त्वाचा घटक ठरतो. हे आपल्याला नाकारता येत नाही आणि प्र्रत्येक वास्तव काळाचा एक धागा भूतकाळ आणि भविष्यकाळाशीही जोडलेला असतो. याबाबत आपल्याला नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा अभ्यास करता येईल. कविता कोणत्याही प्र्रकारची लिहिली का जाऊ नये? प्र्रत्येक कवीच्या अभिव्यक्तीचे ते स्वातंत्र्य आहे. सामाजिक कविताही तशी आपल्यापासून वेगळी काढता येत नाही. समाजाच्या भावना या आपल्याच असतात. कवीच्या दृष्टीने व्यक्तिगत असे काहीच नसते या सगळय़ा पार्श्वभूमीवर कवितेकडे व्यापकपणे पहायला हवे. पहिला मुद्दा समाजातील अनिष्ट व्यवस्थे विरुद्धची आपली अस्वस्थता मिटवण्यासाठी आपण कविता लिहितो. त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिगत भावभावना व्यक्त करण्यासाठीही कविता लिहिली जाते. इथे फरक असा आहे की आपल्या लेखनात आपण कुणाच्या बाजूने आहोत याचे भान कवीला नसेल तर व्यवस्थेविरुद्धची कविता आणि आपल्या व्यक्तिगत भावभावना व्यक्त करणारी कविता यात गल्लत होऊ शकते. उदाहरणार्थ भावगीते आपल्याला आवडतात. अनेक चांगले कवीही आवड म्हणून त्या प्रकारचेही लेखन करतात. परंतु तो त्यांचा कवितेचा चेहरा होत नाही. भावगीत स्वरूपातील कविता त्या कवीनी पुढे सातत्याने लिहिली तर त्यांना कवी म्हणून चेहरा प्र्राप्त झाला नसता. आपण आपल्या समाधानासाठी गीत स्वरूपाची कविता किंवा कवितेसारखे काहीतरी गीत लिहीत राहिलो तर त्यामुळे गंभीर कविता लिहिणे आणि अशा प्रकारची कविता लिहिणे यात मूलभूत फरक आहे तो लक्षात येणार नाही. आणि आपण तो फरक समजूनच घेतला नाही तर कवी म्हणून वय निसटून गेल्यावर एकेदिवशी आपण आपले आयुष्य कवी म्हणून फुकट घालवले याची जाणीव होईल, तेव्हा आपल्या हाती काहीच नसेल. याचे भान वेळीच यायला हवे. प्रत्येकाने विद्रोहीच कविता लिहायला पाहिजे असेही नाही. व्यक्तिगत साधा अनुभवही कवितेचा आशय व्यापक करत असतो. आणि दुसरीकडे लिहिणाऱयात आतूनच विद्रोहाचा आवाज नसेल तर तो त्या प्रकारची कविता कशी लिहील. खरंतर व्यक्तिगत भावनांच्या अनुभवातून जादा पैस निर्माण करणारी कविता लिहिली जाऊही शकते. काही दिवसापूर्वी कवयित्री सरिता पवार यांची एक कविता वाचनात आली. प्रवासातील एक छोटासा अनुभव. पण तो लिहिताना या कवयित्रीने तो सार्वत्रिक करताना समाजमनाला या कवितेत जोडून घेतल्याचे लक्षात येते. त्यामुळे या कवितेतील व्यक्तिगत भावनाही समूहाची झाली आहे. ती कविता आपल्याला खालील प्रमाणे वाचता येईल!
अनवट रस्त्यावरचा हा प्रवास
रोजच चालते मी एकाकी
माणसं भेटतात वळणावरती
कधी आंधळी, लंगडी, पांगळी, कधी कष्टकरी राब राब राबणारी बारमाही शेतात
कधी हमालीच ओझं वाहणारी
दिवसागणिक चोवीस तास
तरीही आश्वासक माणुसकी फुललेलीच असते त्यांच्या चेहऱयावर
जसे मी जाणाऱया रस्त्याच्या कडेला खळखळून वाहणारे पाण्याचे पाझर
तशीच त्यांची बोलकी नजर
मग मी गुणगुणते त्यांच्या मनीच्या माझ्या मनी गुजगोष्टी
आणि माझ्या नकळत माझाही हात पुढे सरसावतो त्यांच्या मदतीच्या कष्टासाठी!
(या लेखाबरोबर सांस्कृतिक महाराष्ट्र हे सदर संपत आहे)
अजय कांडर