टेक्सास
जलवायु बदलाच्या कारणास्तव 2100 सालापर्यंत सागरी किनारी भागांमध्ये राहणाऱया 41 कोटी लोकांवर बेघर होण्याची वेळ येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सन 2100 म्हणजेच येणाऱया 79 वर्षांमध्ये सागरी किनारी भागातील विविध देशातील 41 कोटी लोक समुद्राचे पाणी घुसून बेघर होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. संदर्भातला एक अहवाल नेचर कम्युनिकेशन यामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. नेदरलँडमधील एनयुएस एनव्हार्यन्मेंटल रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या संशोधकांच्या मते वरील परिस्थिती 2100 पर्यंत उदभवणार आहे. जलवायु बदलाच्या कारणास्तव समुद्र पातळीत तीन फुटापर्यंत वाढ होण्याची शक्मयता वर्तवली आहे. पाणी पातळीत झालेली वाढ ही समुद्राकाठच्या राहणाऱया रहिवाशांसाठी धोक्मयाची सूचनाच असणार आहे. सध्याचे पातळी वाढण्याचे प्रमाण हे 53 टक्के अधिक असल्याचेही संशोधकांनी अहवालामध्ये म्हटले आहे. समुद्रसपाटीपासून सहा फूट उंचीपेक्षा कमी पातळीवर असणाऱया क्षेत्रांचा विचार करता जगभरामध्ये 26 कोटी लोक राहतात. साल 2100 पर्यंत यांची संख्या 41 कोटीपर्यंत पोहोचेल. पातळी वाढण्याचा परिणाम सर्वाधिक मोठय़ा प्रमाणात इंडोनेशियाला भोगावा लागणार आहे.