ऑनलाईन टीम / अमरावती :
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे होत आहे. कामाचा दर्जा अत्यंत चांगला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या अमरावती आणि औरंगाबादच्या कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी महामार्गाचे काम उत्तमरित्या सुरु असल्याचे सांगितले.
पुढे ते म्हणाले की, समृध्दी महामार्गाचे काम चांगचे झाले आहे. 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी असा समृद्धी महामार्गाचा टप्पा सुरु केला जाईल. तर शिर्डी ते मुंबई दरम्यानचा प्रवास 1 मेपर्यंत सुरु केले जाईल. लॉकडाऊनच्या काळात कामात खंड पडण्याची भीती होती, मात्र तसे घडले नाही, काम मंदावले नाही. कामाचा दर्जा अत्यंत चांगला आहे. राज्याला अभिमान वाटेल असा काम होत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.