रोहन खंवटे यांचे आवाहन : रूग्णाश्रयाच्या मनारंजन केंद्रचा शुभारंभ
प्रतिनिधी /पर्वरी
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज नात्यांतील संवाद, आमची संस्कृती आपण कुठे तरी हरवत चाललो आहोत. संस्कृती टिकवून ठेवण्याच्या आम्ही गोष्टी करतो पण ती टिकवायची कुणी हा खरा प्रश्न आहे. खरे तर आजच्या घडीची ही शोकांतिका आहे असून आमचा समृध्द संस्कृतीचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य असून ती जपण्यासाठीच आज एकत्रित समाजाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
मातृछाया संचालित काबेसा बांबोळी येथील रूग्णाश्रय संस्थेच्या 15व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ज्ये÷ नागरिकांसाठीच्या मनोरंजन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे व ज्ये÷ नागरिक उमेश बुडकुले, स्थानिक आमदार रूडॉल्फ फर्नाडिस, मातृछायेचे अध्यक्ष अनुप केणी, शिरीष आमशेकर, रुग्णाश्रयाच्या प्रमुख डॉ. शशिकला सहकारी आदी उपस्थित होते.
ज्ये÷ नागरिकांना एकत्र आणण्याच्या हेतूने पर्वरीत भजन परंपरा सुरू केल्याचे खंवटे यांनी सांगितले. आज वेगवेगळय़ा मंदिरात त्यांचे भजन सादर होते. ज्ये÷ नागरिक त्यामुळे एकत्र आले. हे मॉडेल राज्याच्या सर्व भागात सुरू व्हायला हवे. कारण ज्ये÷ांना एकत्र आणून आम्ही त्यांना समाधानाचे जीवन देऊ शकू असे ते म्हणाले.
रुग्णाश्रयाच्या विश्वस्तांचे कौतुक!
कुटुंबातील ज्ये÷ सदस्यांचा व नव्या पिढीतील संवाद सध्या हरवत चालला आहे. हे योग्य नव्हे असे सांगून हे का होते त्याचा विचार व्हायला हवा असे खंवटे म्हणाले. रुग्णाश्रयाचे होम नर्सिंग केंद्र महत्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या युगात ज्ये÷ नागरिकांची काळजी घेण्यासही वेळ नाही अशी समाजाची स्थिती आहे. ही नाळ ओळखून होम नर्सिंगच्या माध्यमातून ज्ये÷ांची काळजी घेण्याबरोबरच समाजात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे कामही रुग्णाश्रयाने केल्यामुळे विश्वस्त संस्थेचे त्यांनी कौतुक केले.