प्रतिनिधी/ रत्नागिरी :
वादळग्रस्तांसाठीच्या आर्थिक निकषात बदलङ मदत निधीत 10 ते 50 हजाराची भरघोस वाढ
मंत्री उदय सामंत यांची माहिती
कोकणात चक्रीवादलामुळे मोठे नुकसान झाल्याने अंशतः नुकसानीच्या निकषात बदल करून 6 हजाराऐवजी 15 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला. पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना दीड लाख रुपये, हेक्टरी 18 हजाराऐवजी 50 रु नुकसानभरपाई देण्याचा निर्णय गुरुवारी पार पडलेल्या मुख्यमंत्री यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. शरद पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , रायगड पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिह्याला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला यामध्ये जे अंशतः रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जात होती ती पुरेशी नसल्याचे बैठकीला उपस्थित सर्व मंत्रांचे एकमत झाले यामध्ये मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील नुकसानी बाबत वस्थुस्थिती मांडली, अखेर सर्वांची मते जाणून घेतल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नुकसानीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी त्वरित करण्याच्या सूचना ही त्यांनी मुख्य सचिव अजय मेहता व त्यांच्या टीमला दिल्या आहेत.
कोकणात मोठया प्रमाणावर झाडे कोसळली असून नव्याने झाडे लावण्यासाठी पूर्वी जी रोजगार हमीत फळद्योन योजना होती ती याठिकाणी पुन्हा राबवण्याचा निर्णय ही या बैठकीत झाला असून हेक्टरी 18 हजार नुकसान भरपाई ऐवजी आता 50 हजार मिळणार आहे आणि पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना 95 हजाराऐवजी दीड लाख मिळणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
चौकट
आजपासून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत दापोलीत ठाण मांडून बसणार आहेत, याठिकाणी 2 दिवस राहून वादळात नुकसान झालेल्या लोकांना मदत मिळवून देण्यासाठी नियोजन करणार आहेत.