केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाकडून माहिती सादर
नवी दिल्ली
केंद्र सरकारने चालू विपणन सत्रात 2021-22 मध्ये आतापर्यंत 606.19 लाख टन धान्याची खरेदी केली आहे. धान्याची सर्वाधिक खरेदी हि पंजाबमध्ये झाली आहे, अशी माहिती अन्न मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास 77 लाख शेतकऱयांना एमएसपी मूल्य 1,18,812.56 कोटी रुपयाचा लाभ मिळाला आहे.
चालू विपणन सत्रात 23 जानेवारीपर्यंत एकूण खरेदीत 186.85 लाख टन धान्य झाले असून यात पंजाबमधून 82.62 लाख टन, छत्तीसगढ 69.08 लाख टन, तेलंगणातून 55.30 लाख टन हरियाणामधून आणि 56.49 लाख टन उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आले आहे.
धान्य विपणनचे सत्र
विपणन सत्र 2020-21 दरम्यान सरकारने 1,69,133.26 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्यावर आधारीत 895.83 लाख टन धान्य खरेदी केले होते. सरकार भारतीय खाद्य निगम (एफसीआय)सोबत राज्य एजन्सीच्या माध्यमातून खरेदीचे कार्य करत आहे.