करमळी बैठकीत जमीन मालकाचा. निर्धार..
प्रतिनिधी /वाळपई
सरकारने मंजूर केलेले भुमी अधिकारिणी विधेयक सत्तरी तालुक्मयाच्या फायद्याचे नाही .यामुळे सरकारने हे विधेयक रद्द करावे व सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न सोडवावा अशा प्रकारची मागणी जमीन जमीन मालकातर्फे करण्यात आली आहे. या विधेयकाला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात जनजागृतीला प्रारंभ झालेला आहे . या संदर्भाच्या बैठका सध्या तरी सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा गावांमध्ये घेण्यात येत आहेत .या संदर्भात एक महत्वाची बैठक करमळी बुद्रुक याठिकाणी संपन्न झाली .या बैठकीला मोठय़ा प्रमाणात जमीन मालकांची उपस्थिती होती. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी विश्वेश प्रभू ,बातू गावडे गणपत झर्मेकर व इतरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुदेश तीवरेकर यांनी सांगितले कि आज गोमंतकीयांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .भाजपा सरकार आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वादग्रस्त स्वरूपाची विधेयक आणून गोव्याचे मूळ अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. या प्रयत्नांना त्यांना कदापि यश येणार नाही . यासाठी गोव्यातील मुळ नागरिकांनी जागृत होणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले . सतरी तालुका हा पूर्णपणे जमीन मालकीच्या प्रश्नावरून अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहे . याची जाणीव सरकारला नसणे ही खरोखरच खेदाची बाब असल्याचे यावेळी ते म्हणाले .बातू गावडे यांनी यावेळी बोलताना सरकारच्या या वादग्रस्त विधेयकासंदर्भात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली व सरकारला यापुढे गोवेकरांचे हीच जपायचे असेल तर हे विधेयक त्वरित मागे घ्यावे अशा प्रकारची मागणी केली
यावेळी बोलताना विश्वेश प्रभू यांनी सांगितले की सरकारने गोवामुक्ती नंतर पहिल्यांदाच हे वादग्रस्त स्वरूपाचे विधेयक मंजूर करून घेतले आहे. यामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्मयता त्यांनी वर्तविली .गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्मयातील जमिनी मालकीचा प्रश्न भिजत पडलेला आहे . या जमीनमालकांना न्याय देण्याऐवजी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतलेले आहे .या विधेयकाच्या माध्यमातून गोव्याला मोठय़ा प्रमाणात नूकसानी होण्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केली. यामुळे हे विधेयक ताबडतोब रद्द करावे अशा प्रकारची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली. या विधेयकाच्या विरोधात येणाऱया काळात मोठय़ा प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे. सत्तरी तालुक्मयातील नागरिक या आंदोलनामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
आगुस्तीन डिकोस्टा, सलमान खान महादेव नाईक, राजेश सावंत यांनी यावेळी आपले विचार मांडले. यावेळी मोठमोठय़ा घोषणा देऊन हे विधेयक रद्द करण्याची मागणी उपस्थितांनी केली.