ऑनलाईन टीम / मुंबई :
सर्व आमदारांना मुंबईत हक्काची घरं देण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे सरकारने गुरुवारी विधानसभेत केली. त्यावरुन विरोधकांसह सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी असून, यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही आता फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांचा फोटो फेसबुकवर शेअर करत सरकारने आमदारांऐवजी गरजूंना घरे द्यावीत, असे म्हणत सरकारला आरसा दाखवला आहे.
खोत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, परळला टाटा हॉस्पिटला कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सबंध भारतातून लोकं येतात. त्यांची ट्रीटमेंट तीनातीन महिने चालते. अशामध्ये नातेवाईक आणि रुग्णाला राहण्याची गैरसोय होते. अक्षरशः फुटपाथ वर त्यांना तीनातीन महिने रहावं लागतं. मी सरकारला विनंती करेल की, आपण आमदारांना घरे देण्याऐवजी या गरजू व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.