वाळपई प्रतिनिधी
बुधवारी आयआयटी प्रकल्पाच्या आंदोलनावरून आंदोलक व पोलीस यांच्या दरम्यान झालेल्या धुमश्?चक्री गंभीर दखल घेऊन आज सरकारने आयआयटी प्रकल्पाच्या सीमारेखनाचे काम बंद ठेवले. मात्र या प्रकल्पाला विरोध करणाऱया विरोधकांनी नियोजितपणे मुरमुमुणे याठिकाणी रस्त्यावर उतरून प्रकल्पाला तीव्र स्वरूपाचा विरोध केला. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन कदापि मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.
दरम्यान गोवा राज्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पोलीस स्थानकावर येऊन एकूण परिस्थितीचा सविस्तरपणे आढावा घेतला व त्यानंतर त्यांनी शेळ मेळावली भागांमध्ये जाऊन आंदोलन व नागरिकांची सविस्तरपणे चर्चा केली. सरकारने या प्रकल्पाच्या संदर्भात फेरविचार करावा व या नागरिकावर व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते त्वरित मागे घ्यावे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे
गुन्हे मागे घ्यावे अन्यथा आंदोलन राज्यापातळीवर.
दरम्यान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकूण प्रकल्पासंदर्भात सरकार ज्या पद्धतीने लादण्याचा प्रयत्न करीत आहे त्यासंदर्भात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. आपण मुख्यमंत्री असताना एनआयटी व एसईझेड सारखे लोकांना नको असलेले प्रकल्प आपण लोकांच्या भावनेची कदर करून मागे घेतले. गोवा सरकारची यंत्रणा मात्र आयटी प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या भागाचे आदरणीय नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हा प्रकल्प सदर भागातून इतरत्र हलवावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. या मागणीची कदर सरकारने करावी अशा प्रकारची मागणी यावेळी त्यांनी केली .काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला आहे .त्यांच्यावर गुन्हे दाखल करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनातून बाहेर काढण्याचा सरकारचा डाव असल्याचे दिगंबर कामत यांनी स्पष्ट केलेली आहे. वाळपई शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवून शहराला छावणीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न हा दुर्दैवी स्वरूपाचा आहे. वाळपई शहरांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. गोवा सरकारच्या पोलीस खात्यामध्ये आज वरि÷ पातळीवर कार्यरत असलेल्या अधिकाऱयांची या शहराशी भावनिक नाते जोडलेले आहे .त्यांचाच वापर करून या भागातील जनतेवर कायद्याचा वचपा काढण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हा खरोखर दुदैवी स्वरूपाचा असून यामुळे येणाऱया काळात या भागातील पोलिस यंत्रणेशी असलेले भावनिक संदर्भाचे संबंध बिघडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तत्पुर्वी त्यांनी उपधिक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. त्यानंतर त्यांना एक निवेदन सादर करून या सर्व प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे नमूद करण्यात आलेले आहे. त्याची ताबडतोब सरकारने दखल घ्यावी व आयटी प्रकल्पासंदर्भात नागरिकांशी सौहार्दपूर्ण चर्चा करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे
तदनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष तोडणकर स्वाती केरकर विजय बिके यांच्या समवेत शेळ मेळावली भागांमध्ये भेट देऊन नागरिकांशी व आंदोलन करण्याची सविस्तरपणे चर्चा केली
दरम्यान पोलिसांकडून ज्याआंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .सदर गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. सरकारने गोव्याचा सर्व पोलीस फौजफाटा जरी शेळ मेळावली याठिकाणी आणला तरी सुद्धा त्याचा कोणताही परिणाम या प्रकल्पाला विरोध करणाऱयावर होणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
शुक्रवार पासून पुन्हा एकदा आयटी प्रकल्पाच्या संबंधित जमिनीमध्ये आरक्षणाचे काम सुरू झाल्यास त्यालाकडाडून विरोध करण्यात येणार असून आता करो या मरो अशा प्रकारची भूमिका घेऊनच या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाला निर्णय घेणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केलेले आहे.
मोर्चा अतिंमक्षणी रद्द करण्याचा निर्णय.
दरम्यान बुधवारी या प्रकल्पाला विरोध करताना आंदोलनकर्त्यांनी जमिनीवर झोपून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असता मात्र पोलीस निरीक्षकंकानी महिला आंदोलनकर्त्यावर आतताईपणा केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करीत बुधवारी पोलीस स्थानकावर मोर्चा नेण्यात आला होता. मात्र रात्री उशिरा सदर मोर्चा मागे घेण्यात आला होता .आज पुन्हा एकदा वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा आयोजित करून यासंदर्भात जोरदार मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पोलिस स्थानकावर मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांनी शेवटच्या टप्प्यात सदर मोर्चा नेण्याचा निर्णय बदलला .यामुळे पोलिस यंत्रणेची बऱयाच प्रमाणात पंचायत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
आंदोलन सुरूच राहणार कोणीही थांबवू शकत नाही.
दरम्यान नियमितपणे आज सकाळी आयटी प्रकल्पाच्या विरोधकांनी मुरमुणे या ठिकाणी रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आंदोलन केले. यामध्ये मोठय़ा प्रमाणात भागातील नागरिक व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे आज आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षणीय स्वरुपाची होती. यावेळी त्यांनी जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिलेला आहे. सरकारने आतापर्यंत आमच्यावर मोठय़ा प्रमाणात दबाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आम्ही अजिबात भीक घातलेली नाही.येणाऱया काळातही दबावाचे तंत्र वेगवेगळय़ा मार्गातून सुरूच राहणार असून नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार तनमन याद्वारे घेतलेला आहे. यामुळे या आंदोलनाची ताकद येणाऱया काळात सरकारला कळून चुकेल अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे .सत्तरी तालुक्मयातील अनेक गावातील प्रतिनिधी या आंदोलनाला प्राथमिक स्वरुपात पाठिंबा देत असून सरकारने फक्त चार गावाचे हे आंदोलन आहे असे समजू नये असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलेले आहे.