सुदीप ताम्हणकर यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
दृष्टी कंपनीला आग्वाद तुऊंग 32 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देऊन सरकारने गोवा विक्रीस काढल्याचे सिध्द केले आहे, असा आरोप सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे. गोवा स्वातंत्र्यसंग्रामावेळी अनेक नेत्यांनी आग्वाद तुऊंगात शिक्षा भोगल्या आहेत. ती एक ऐतिहासिक वास्तू असून गोमतकीयांच्या शौर्याचे प्रतीक आहे. मात्र सरकारने तो किल्ला भाडेतत्त्वावर देऊन आणखीन एक लुटण्याचे दालन उघडले आहे, असेही ताम्हणकर म्हणाले.
शनिवारी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दृष्टी ही कंपनी थकबाकी भरण्यात अपयशी ठरल्यामुळे थकबाकीला व्याज आकारायचे नाही उलट गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) थकबाकी भरण्यासाठी कालावधी वाढवून दिला आहे. सरकार सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त कराचा बोजा टाकून दृष्टी कंपनीची बाजू घेत आहे. त्या प्रकरणात नक्की कुणाचा आणि किती फायदा आहे ते दिसून येत आहे, असा आरोपही ताम्हणकर यांनी केला आहे.