नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत राज्यात पोलीस बदली रॅकेट झालं असून त्याचे फोन टॅपिंग इंटरसेप्ट्स देखील आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन त्यांना सर्व पुरावे सादर केले आहेत. यावेळी याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलतान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहसचिवाकंडे या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे दिले आहेत. त्यांना मी विनंती केली आहे की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करवी. कागदपत्रांचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई केली जाईल. 25 ऑगस्टपासून हा अहवाल सरकारकडे होता. तसेच तत्काली डीजीपी यांनी सीआयडी चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतरसुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कोण उघडं पडेल यांची भीती राज्य सरकारला वाटत होती?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या प्रकरणात गरज पडली तर न्यायालयातही जाऊ. नवाब मलिक यांनी केलेला दावा खोटा आहे. बदल्यासंदर्भाताला अहवाल डीजीपी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिला होता. या अहवालातील काही रेकॉर्डिंग मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ऐकल्या आहेत. सगळं प्रशासन पॅरालाईज झालं असं मी म्हणणार नाही. मात्र, सरकारला आत्मचिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे. 15 वर्षे निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेवर घेतलं जातं. या अधिकाऱ्यांकडू बॉम्ब ठेवला जातो. खंडणी मागितली जाते. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.