ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे. तसेच लस उत्पादक कंपन्यांकडून कमीत कमी किंमतीत लस खरेदी करून ती राज्यांना कशी वितरित करता येईल, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने सरकारला दीर्घकाळ 150 रुपयांत लस पुरवणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.
भारत बायोटेकने म्हटले आहे की, केंद्र सरकारला ‘कोवॅक्सिन’ लस प्रति डोस 150 रुपयांप्रमाणे देणे फार काळ शक्य नाही. कारण केंद्र सरकारच्या पुरवठा शुल्कामुळे खासगी क्षेत्रांतील लसींच्या किंमती वाढत आहेत. 150 रुपये प्रति डोस ही स्पर्धात्मक किंमत नाही. त्यामुळे सरकारने हा तोटा भरून काढण्यासाठी खासगी बाजारपेठेत लसीची किंमत वाढवण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी.