प्रतिनिधी/ सातारा
एसटी कामगारांना संपावर येण्यास भाग पाडण्यासाठी निलंबनाची कारवाई करणाऱया राज्य सरकार व एसटी महामंडळाला साताऱयातील कर्मचाऱयांनी जोरदार धक्का दिला आहे.
पगारवाढीसह राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप अद्यापही सुरूच आहे. अनेक मागण्या मान्य केल्यानंतरही विलिनीकरणावरच अडून बसलेल्या कामगारांच्या विरोधात राज्य सरकारनं निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात साताऱयातील एसटी कामगारांनी वेगळंच पाऊल उचललं आहे.
विलिनीकरणाचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आहे. त्या समितीचा निर्णय सरकारला बंधनकारक असेल. इतर बहुतेक मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळं कामगारांनी कामावर रुजू व्हावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा सरकारनं दिला आहे. त्यानुसार, महामंडळानं कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत हजाराहून अधिक कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे. महिनाभर लांबलेला संप आणि निलंबनाच्या भीतीमुळं काही कामगार कामावर परतण्याच्या विचारात आहेत. सातारा आगारातही काही कामगार कामावर परतू लागले होते. त्यांना थोपवण्यासाठी संपावर ठाम असलेल्या कामगारांनी कडक पवित्रा घेतला आहे. या कामगारांनी आगार प्रमुखांना निवेदन देत संपात सहभागी झालेल्या सर्वच कामगारांच्या सामूहिक निलंबनाची मागणी केली आहे.
एसटीच्या आंदोलनात जे हुतात्मे झालेत, त्यांचा दुखवटा पाळण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एसटी प्रशासन आमच्यासोबत सूडबुद्धीनं वागत आहे. सातारा आगारात एकूण चार हजार कर्मचारी असून आतापर्यंत यातल्या 192 कर्मचायांचं निलंबन केलं गेलंय. प्रशासनानं मोजक्या लोकांना निलंबित करणं हा आमच्यावर मोठा अन्याय आहे.